शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘कडकनाथ’प्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:32 IST

सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायाची व्याप्ती राज्यभरात असल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीच्या फिर्यादी ...

सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायाची व्याप्ती राज्यभरात असल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीच्या फिर्यादी दाखल कराव्यात, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. गुन्हे दाखल करुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, तर वरिष्ठांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळ्यामध्ये राज्यभरातील ८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची ५00 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप कडकनाथ कोंबडी पालन करणाºया शेतकºयांकडून होत आहे. त्यामुळे कंपनी संचालकांविरुध्द दिवसागणिक संतापाची भावना वाढीस लागत आहे. वेगवेगळ्या पध्दतीने खुलासे करुन कंपनी संचालकांकडून शेतकºयांना शांत करण्याची उठाठेव सुरु आहे. मात्र संतप्त शेतकरी आता ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.माजी खासदार शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, कागल या तालुक्यात दौºयावर असताना त्यांच्याकडेही पाचशेहून अधिक शेतकºयांनी तक्रारी सांगितल्या. या कंपनीचे मुख्य कार्यालय इस्लामपूर येथे असले तरी, राधानगरी, कागल तालुक्यातील व्यवहार तेथील स्थानिक कार्यालयातील एजंटामार्फत झालेले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी तक्रारीसाठी इस्लामपूरकडे न येता स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.संबंधितांवर कारवाईची मागणीदरम्यान, शेट्टी यांनी यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला असता, त्यांना गुन्हे दाखल करुन घेण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाºयांचे मार्गदर्शन घेतले जात असल्याचे सांगण्यात आले. ३० आॅगस्टरोजी महापूरग्रस्त आणि शेतकºयांच्या मागण्यांसाठी काढण्यात येणाºया मोर्चानंतर या प्रकरणात पूर्णपणे लक्ष घालणार आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याविषयी मागणी करणार आहे, असे ते म्हणाले.