शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुद्रांक परवान्यांचे नूतनीकरण अडले- सांगलीत नागरिकांच्या भर उन्हात रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:05 IST

सांगली : जिल्ह्यातील ९० टक्के मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण न झाल्याने सर्वत्र मुद्रांक खरेदीसाठी भर उन्हात नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. गेल्या दहा दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने मुद्रांक मिळविणे आता नागरिकांसाठी दिव्य कार्य होऊन बसले आहे.सांगली शहरात एकूण ५० मुद्रांक विक्रेते आहेत. त्यापैकी केवळ ४ विक्रेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे. ...

ठळक मुद्देव्यवसाय कराची अट : ; सरकारी गोंधळामुळे संतप्त प्रतिक्रिया

सांगली : जिल्ह्यातील ९० टक्के मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण न झाल्याने सर्वत्र मुद्रांक खरेदीसाठी भर उन्हात नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. गेल्या दहा दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने मुद्रांक मिळविणे आता नागरिकांसाठी दिव्य कार्य होऊन बसले आहे.

सांगली शहरात एकूण ५० मुद्रांक विक्रेते आहेत. त्यापैकी केवळ ४ विक्रेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे. उर्वरित विक्रेत्यांचे अर्ज मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. यापूर्वी दरवर्षी हा परवाना नूतनीकरण करून घ्यावा लागत होता. या वर्षापासून तीन वर्षांसाठी नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विके्रत्यांसाठी एका बाजूला मुदतीचा दिलासा मिळाला असताना, दुसरीकडे व्यवसाय कराची अट अडचणीची ठरत आहे. नूतनीकरणाकरिता मुद्रांक विक्रेत्यांना व्यवसाय कर भरण्याची किंवा संबंधित विभागाच्या नाहरकत दाखल्याची अट लागू केली आहे. या अटीमुळेच बहुतांश परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे.

व्यवसाय कराची अट अन्य जिल्ह्यात कुठेही नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सांगलीत ही अट रद्द करावी म्हणून मुद्रांक विक्रेता संघटनेने मुद्रांक जिल्हाधिकाºयांशी चर्चाही केली होती, मात्र या चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. परिणामी नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. भर उन्हात मुद्रांक विक्रेत्यांच्या दुकानांसमोर तासन् तास नागरिकांना रांगा लावून प्रतीक्षा करीत ताटकळत उभे राहावे लागत आहे. नागरिकांतून संतापही व्यक्त होत आहे. तरीही त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली जात नसल्याचे चित्र आहे....तर मनुष्यवधाचा गुन्हा : नितीन शिंदेमनसेचे नेते, माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, अत्यंत तीव्र उन्हाच्या झळा सांगलीत असताना, मुद्रांकासाठी नागरिक रस्त्यावरच रांगा लावून थांबत आहेत. अशात कोणाचाही उन्हाने किंवा रांगेत उभे राहून बळी जाऊ शकतो. अशी घटना जर घडली, तर ज्यांनी हा गोंधळ घातला आहे, अशा संबंधित शासकीय विभागाच्या अधिकाºयांवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करू. तातडीने मुद्रांकाची व्यवस्था सुरळीत करावी, कुठेही नागरिकांच्या रांगा लागता कामा नये, अशी आमची प्रमुख मागणी आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनही छेडले जाईल.जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण रखडल्याने सांगलीत मुद्रांक खरेदीसाठी भर उन्हात नागरिकांना रांगा लावून ताटकळत थांबावे लागत आहे.