शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजनेचे नुतनिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:38 IST

सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता रु 12/- फक्त इतका आहे. जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 50 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात.

ठळक मुद्देलिंक केलेल्या बचत खात्यावर 30 मे पर्यंत पुरेशी रक्कम जमा करा-- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली: प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट ऑफिसमार्फत गरीब व वंचित घटकांसाठी प्राधान्याने राबविल्या जात आहेत. या योजनांचे 31 मे 2020 रोजी नुतनिकरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्व बँकांच्या व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 5 लाख 41 हजार ग्राहकांनी सुरक्षा विमा योजनेत तर 2 लाख 39 हजार ग्रहाकांनी जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता हे प्रमाण कमी आहे. यासाठी या विमा योजनांमध्ये यापुर्वी पासून सहभाग झालेल्यांच्या खात्यातून 31 मे 2020 रोजी विमा हप्ता नावे टाकण्यात येणार आहे.

ज्यांच्या खात्यांवर पुरेशी रक्कम असणार नाही, ते योजनेतून बाहेर पडतील व त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. यासाठी सर्वांनी आपल्या लिंक केलेल्या बचत खात्यावर दिनांक 30 मे पर्यंत पुरेशी रक्कम जमा करावी. तसेच जे पात्र व्यक्ती या योजनेत सामील झाले नाहीत, त्यांनी सामील होऊन या योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी आपले खाते असलेल्या बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता रु 12/- फक्त इतका आहे. जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वयवर्षे 18 ते 50 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता 330/- फक्त इतका आहे. या योजनांतर्गत सहभाग घेण्यासाठी एक पानी साधा फॉर्म भरुन आपल्या खाते असणाऱ्या बँकेत/पोस्टात द्यावयाचा आहे. बँक/पोस्ट ऑफिस आपल्या खात्यातून ऑटो डेबिट पध्दतीने विमा हप्ता कपात करुन विमा कंपनीला पाठवते. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbankबँक