शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

‘सरकारां’चं रिलेशन; इलेक्शन टू इलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:37 IST

दत्ता पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : पाच वर्षांपूर्वी भाजपचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांचा विधानसभा निवडणुकीत निसटता ...

दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : पाच वर्षांपूर्वी भाजपचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांचा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला. त्यानंतर पाच वर्षांत घोरपडेंनी तासगावची नाळ तोडून टाकली. विधानसभा निवडणुुकीचे वेध लागल्यानंतर, पाच वर्षांनी पुन्हा सरकारांनी तासगाव तालुक्याकडे मोर्चा वळवला. दौरे काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे तासगाव तालुक्याशी ‘सरकारांचं रिलेशन; केवळ इलेक्शन टू इलेक्शन आहे का?’ याची चर्चा सुरू झाली आहे.पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात भाजपकडून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी जोरदार लढत दिली होती. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत घोरपडेंना अवघ्या २२ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. घोरपडेंच्या पराभवात पक्षांतर्गत माशी शिंकल्याची चर्चा सुरू झाली. गृहमंत्री पदावर असूनही आर. आर. पाटील यांच्याविरोधात निसटता पराभव झाल्याचे शल्य घोरपडेंना सातत्याने बोचत राहिल्याची चर्चा होत होती.या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र घोरपडेंनी भाजपशी फारकत घेतली. पाच वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्टÑवादीशी हातमिळवणी करून लढवल्या. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपशी आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यातील मतभेद उघडकीस येऊ लागले. अगदी जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी पाठिंबा देतानाही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या डी. के. पाटील यांना विरोध करून, विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना अध्यक्ष करण्याच्या अटीवरच पाठिंबा जाहीर केला. घोरपडेंच्या मनातील खदखद सातत्याने समोर येत असतानाच, लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजकारणाला कलाटणी मिळाली. खासदार पाटील यांच्याशी जुळवून घेतले. तेव्हापासून सरकार-खासदार मनोमीलन एक्स्प्रेस सुरू झाली.भाजपचा वारु सुसाट धावू लागल्याने आणि मुख्यमंत्र्यांकडून, भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारीची हमी मिळाल्याने, सरकारांनी पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यात दौरा काढण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी उपळावी येथील भाजपच्या कार्यक्रमास हजेरी लावली. त्यापूर्वी राजापूरसह येळावी गटातील काही गावांचा दौरा केला. खासदारांच्या सत्काराला हजेरी लावली. सरकारांनी तासगाव तालुक्यातील गावोगावी भेटीगाठीचा धडाका लावला आहे. मात्र या भेटीगाठी सुरु असताना, पाच वर्षे सरकारांनी तासगाव तालुक्याकडे पाठ का फिरवली? असा प्रश्न उपस्थित होत असून, घोरपडे सरकारांचे तासगावशी रिलेशन विधानसभा निवडणुकीपुरतेच आहे का? याची कार्यकर्त्यांत चर्चा सुरु आहे.तासगावात गट उभारण्यात यश नाहीपाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना खासदारकीची लॉटरी लागली. त्यापूर्वी तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात केवळ आर. आर. पाटील यांचाच गट होता. पाच वर्षांपूर्वी संजयकाकांचा तासगाव तालुक्यापुरता, तर अजितराव घोरपडेंचा कवठेमहांकाळ तालुक्यापुरता मर्यादित गट होता. मात्र संजयकाका खासदार झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात राष्टÑवादी आणि घोरपडे सरकारांच्या गटाला धक्के देत, स्वत:चा गट तयार केला. मात्र सरकारांना पाच वर्षात तासगाव तालुक्यात स्वत:चा गट तयार करण्यात पूर्णपणे अपयश आले.खासदारांवरच भरोसातासगाव तालुक्यात अजितराव घोरपडेंना मानणारा स्वत:चा गट नाही. किंंबहुना तासगाव तालुक्याशी पाच वर्षात जनतेशी कोणतीच नाळ राहिली नाही. ते तालुक्यात फिरकलेही नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवताना, सरकारांना खासदार संजयकाका पाटील यांच्याच भरवशावर रहावे लागणार असल्याचे चित्र आहे.