शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पालिकेत पुन्हा लाल फितीचा कारभार

By admin | Updated: November 11, 2014 00:01 IST

परवाने रखडले : अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होते अडवणूक

सांगली : ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे हत्यार उपसून, कानउघाडणी करून आयुक्तांनी केलेले सर्व प्रयत्न आता फोल ठरले आहेत. बांधकाम परवान्यासाठी अजूनही नागरिकांची अडवणूक तिन्ही शहरातील कार्यालयातून होत आहे. अन्य विभागातही अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. बांधकाम परवान्यांची कामे जलदगतीने व्हावीत म्हणून आयुक्त अजिज कारचे यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. जागेच्या क्षेत्रफळानुसार सह्यांचे अधिकार निश्चित केले. नागरिकांना, बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवान्यासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून त्यांनी यंत्रणेत काही बदल केले. शहरातील बांधकाम व्यावसायिक, अभियंते, आर्किटेक्ट यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांच्याही सूचनांचा समावेश यंत्रणा बदलावेळी करण्यात आला. इतक्या प्रयत्नानंतरही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लाल फितीच्या कारभारात किंचीतही फरक पडला नाही. लाचप्रकरणी यापूर्वी कर्मचाऱ्यांना पकडल्यानंतरही यंत्रणेतील भ्रष्ट कारभार बंद होऊ शकला नाही. सांगली व मिरजेत आजही बांधकाम परवान्याच्या फायली दोन, अडीच महिने नुसत्याच फिरत आहेत. नागरिकांचे हेलपाटे वाढविण्याचे काम आजही इमानेइतबारे सुरू आहे. लाल फितीच्या या कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. काही बड्या बांधकाम व्यावसायिकांचे परवाने जलदगतीने देण्यात येतात. अशा जलदगती कारभारालाही अर्थपूर्ण कारण चिकटले आहे. सर्वसामान्यांच्या फायलींना झिडकारण्याचे काम या प्रक्रियेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साखळीकडून केले जात आहे. (प्रतिनिधी)