शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कृषी औषध कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळावी

By admin | Updated: November 27, 2014 00:19 IST

शेतकऱ्यांची मागणी : फसव्यांवर कारवाई करा

टाकळी : विविध पिकांच्या रोगांवर हमखास नियंत्रणाचे फसवे दावे करणाऱ्या कृषी औषध कंपन्यांवर कारवाई करून, दावण्या व अन्य रोगांमुळे द्राक्ष उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची व नुकसानभरपाई देण्याची मागणी टाकळी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. टाकळीसह परिसरात ६० टक्के द्राक्ष बागायती क्षेत्र आहे. त्यापैकी ७५ टक्के द्राक्षबागांवर अवकाळी पाऊस, हवामान बदल व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. रोगांवर हमखास नियंत्रणाचे फसवे दावे करणाऱ्या औषध कंपन्यांची महागडी औषधे फवारणी करूनही रोग नियंत्रणात आले नाहीत. आतापर्यंत एकरी ७० हजारापर्यंत औषध खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. द्राक्ष पिकावरील हमखास रोग नियंत्रणाचे दावे करणारे औषध कंपनीचे प्रतिनिधी, रोगाने बागांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांकडे फिरकलेही नाहीत. औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने औषधांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अशा बोगस दावे करणाऱ्या औषध कंपन्यांवर करवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्याकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आमगोंडा पाटील यांच्यासह पप्पू गुरव, शेखर कुरणे, राजू पाटील, हुवगोंडा पाटील, पमू पाटील, गटू पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)