शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

समाजातील ‘विश्वास’ उभारतोय मानवतेची खरीखुरी भिंत

By admin | Updated: November 3, 2016 23:39 IST

आदर्शवत उपक्रम : दिवाळीचे पैसे, स्पर्धेतून मिळालेल्या रकमेतून कोकरुडमधील महाविद्यालयीन युवकाने केली मदत

 बाबासाहेब परीट ल्ल बिळाशी कोकरुड (ता. शिराळा) येथील महाविद्यालयीन युवकाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमधून मिळालेले पैसे आणि दिवाळीसाठी वडिलांनी दिलेल्या पैशातून, ऐन दिवाळीत दारात शिळे-पाके तुकडे मागायला आलेल्या गोपाळ समाजाच्या आणि नंदीवाल्यांच्या पालावर जाऊन त्यांच्या २0 मुलांना नवीन कपडे व दिवाळीचा फराळ दिला. यातून त्याने खरीखुरी माणुसकीची भिंत उभी करण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला. या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे विश्वास घोडे. समाजात धर्म, वंश, पंथ, पैसा, प्रतिष्ठा आणि जातीपातीच्या भिंती माणसा-माणसात उभ्या करून, गावात गाव आणि भावात भाव न राखण्याचे षड्यंत्र रचून, संपूर्ण समाजव्यवस्था खिळखिळी करण्याचा आजचा काळ. एकीकडे मोठ्या आवाजाचे फटाके फोडून, बँ्रडेड कपड्यांच्या स्पर्धा करून दिवाळी साजरी होत असताना, ‘माई, शिळंपाकं द्या.., फराळाचं गोड नको, शिळी भाकर द्या...’ असं म्हणत दुसऱ्याच्या दारात जाऊन दाताच्या कण्या करणारी चिमुकली लेकरे पाहून विश्वास घोडे या युवकाच्या मनात माणुसकीचा पाझर फुटला. हा युवक कमावता नाही. पण दातृत्वाला मोठे मन असावे लागते, धन नसले तरी चालते. त्याप्रमाणे त्याने वडिलांनी कपड्यांसाठी दिलेले तीन हजार रुपये, तसेच भाषणातून मिळालेल्या काही पैशातून गरीब मुलांना कपडे देण्याचा निर्णय घेतला. ही कल्पना त्याने त्याच्या मराठी शाळेतल्या गुरुजींना सांगितली. त्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले व त्यांच्यावतीने आणखी पाच कपड्यांचे जोड दिले. त्यानंतर विश्वासने भाऊबीजेदिवशी कोकरुड फाट्याशेजारी असणाऱ्या पालांवर जाऊन तेथील २0 मुलांना शालेय गणवेश दिले व त्यांनाही नव्या कपड्यांचा आनंद मिळवून दिला. स्पर्धा परीक्षांच्या नादी लागून अद्याप हाताला काहीही न लागल्याने बेजार झालेल्या, पण उमेद न हरलेल्या, स्वत:च्या पायावर उभे न राहता इतरांना उभे करण्यासाठी धडपडणाऱ्या या युवकाचा हा ‘विश्वास’ पाहून साऱ्या गावाला अभिमान वाटत आहे. आपल्याला असलेले मोजके कपडे पुरेसे आहेत, गरजेपेक्षा जास्त वापरणे म्हणजे गरजवंतांना ओरबाडणेच, हे त्याचे मत. शाळेत असताना त्याच्या गुरुजींनी ‘एक लाडू गरिबांसाठी’ हा संकल्प सोडला होता. त्यांचाच वारसा तो पुढे चालवत आहे. त्याचा हा उपक्रम धनवानांना अचंबित करणारा आहे. एकीकडे ‘जुने नको असलेले देऊन जा आणि ज्यांना हवे आहे, त्यांनी घेऊन जा’, या संकल्पनेवरील माणुसकीची भिंत सोशल मीडियावर चर्चेत आली असताना, एका महाविद्यालयीन युवकाने कोणताच डामडौल आणि दिखावा न करता माणुसकीचा सेतू यथाशक्ती उभा करून आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या सद्सद्विवेकबुध्दीला सलाम करायलाच हवा!