शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यामुळे निकोप समाजनिर्मितीस बळ: रामचंद्र भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:03 IST

आळसंद : साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. साहित्यातील ज्वलंत व वास्तव लिखाणाने निकोप समाजाची निर्मिती होत असते. साहित्यातून रंजल्या-गांजलेल्या ...

आळसंद : साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. साहित्यातील ज्वलंत व वास्तव लिखाणाने निकोप समाजाची निर्मिती होत असते. साहित्यातून रंजल्या-गांजलेल्या माणसाला न्याय व ऊर्जा देण्याचे काम करावे, असे आवाहन संमेलनाध्यक्ष लेखक रामचंद्र भोसले (सातारा) यांनी केले.बलवडी भा. (ता. खानापूर) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळाच्यावतीने २७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार, सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. सतीश लोखंडे, वासंती मेरू आदी उपस्थित होते.रामचंद्र भोसले म्हणाले, आचार व विचार हा माणसाच्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून देण्याचे काम करतो. नव्या पिढीच्या हाती मोबाईलऐवजी पुस्तक दिले पाहिजे. पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. साहित्यातून माणसाला शहाणपण व संयम मिळतो.डॉ. बी. एन. पवार म्हणाले, देशात सध्या दोन प्रवाह प्रचलित आहेत. एक पुरोगामी व दुसरा प्रतिगामी प्रवाह आहे. पुरोगामी विचारांची कास धरण्यासाठी साहित्य हे प्रभावी व उत्तम माध्यम आहे. साहित्यातून पुरोगामी विचारांची निर्मिती होत असते.स्वागताध्यक्ष सतीश लोखंडे यांनी, साहित्यात वेगवेगळे प्रवाह कार्यरत असून त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. दुभंगलेल्या माणसांची मने जोडणाऱ्या साहित्याची खºयाअर्थाने निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. ‘लोककला आणि मराठी साहित्य’ या विषयावर प्रा. राजेंद्र पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. दुसºया सत्रात कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले.या कार्यक्रमास मारुती पवार, शिवाजी पवार, बी. डी. कुंभार, कुसुम सावंत, रामचंद्र कास्कर, सु. धों. मोहिते, महादेव दुपटे, बापूराव पवार, डी. एम. सरवदे, छबन तुपे, संजय निकम, दीपक कुलकर्णी, हरिभाऊ पुदाले, प्रा. संतोष जाधव, शहाजी जाधव यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते. जे. डी. पवार यांनी प्रास्ताविक केले. ओंकार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश पवार यांनी आभार मानले.मुल्ला, शिंदे यांचे अभिनंदनसाहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेले लेखक सलीम मुल्ला, सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमेलनस्थळी करण्यात आला.