शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

राष्ट्रवादी पदाधिकाºयांत पुन्हा गटबाजी उफाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:00 IST

संघर्षाची धार : पोस्टरबाजीतून एकमेकांवर बहिष्काराचे नाट्यलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांमधील शांत झालेले संघर्षाचे वादळ पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घोंगावू लागले आहे. पोस्टरबाजीतून स्पष्ट होत असलेली गटबाजी आता अधिक गडद होत असल्याने पक्षाचे नेते जयंत पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या असताना, राष्टÑवादीतील पदाधिकारी ...

संघर्षाची धार : पोस्टरबाजीतून एकमेकांवर बहिष्काराचे नाट्यलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांमधील शांत झालेले संघर्षाचे वादळ पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घोंगावू लागले आहे. पोस्टरबाजीतून स्पष्ट होत असलेली गटबाजी आता अधिक गडद होत असल्याने पक्षाचे नेते जयंत पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या असताना, राष्टÑवादीतील पदाधिकारी एकमेकांशी संघर्षाला धार देत बसले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी नियोजनाची जबाबदारी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यावर असली तरी, अंतिम निर्णय जयंत पाटीलच घेणार आहेत. दुसरीकडे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी निर्माण केलेली कोअर कमिटीही कार्यरत झाली आहे. एकमेकांना विश्वासात घेतले जात नसल्याने या दोन्ही पदाधिकाºयांच्या गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. कोअर कमिटी स्थापन केल्यानंतर या दोन्ही गटात उघडपणे एकमेकांवर आरोप सुरू होते. एकमेकांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यापर्यंत हा वाद उफाळला होता. जयंत पाटील यांच्याकडे दोन्ही गटांनी तक्रारी केल्या होत्या.शेवटी वादाचे परिणाम पक्षातील कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होण्यापर्यंत गेल्यानंतर जयंत पाटील यांनी दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला दिला. त्यानंतर बरेच महिने दोन्ही गटांनी एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप बंद केले. तरीही धुसफूस कायम होती. महापालिका निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्यानंतर दोन्ही गट जागृत झाले आणि पुन्हा संघर्षाला धार वाढली. एकमेकांचे कार्यक्रम, वाढदिवसाचे फलक या माध्यमातून गटबाजीचा झेंडा पुन्हा फडकविला जात आहे. त्यामुळे दोन्ही गटांपासून अलिप्त असलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट सुरू झाली आहे. पदाधिकाºयांमधील हा संघर्ष थांबला नाही, तर महापालिका निवडणुकीत पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, अशी शंका कार्यकर्त्यांना वाटत आहे.संजय बजाज यांच्यावर आता महापालिका निवडणुकीतील जबाबदारी मोठी आहे. महापालिकेच्या अनेक निवडणुकांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णयात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. दुसरीकडे कमलाकर पाटील हे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष असले तरी, त्यांच्या गटाची महापालिका क्षेत्रातील असलेली ताकदही दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाशिवाय पक्षाला फायदा शक्य नाही. संघर्ष धुमसत राहिला, तर पक्षाचे मोठे नुकसान महापालिका निवडणुकीत होऊ शकते. याकामी जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रविवारी पार पडलेल्या आरोग्य शिबिरालाही कमलाकर पाटील गटाने दांडी मारली. अनेक नगरसेवकांनीही पाठ फिरवली. पोस्टरबाजीत एकमेकांना दुय्यम स्थान देऊन डिवचण्याचा उद्योगही गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. त्यामुळे दोन्ही गट आक्रमकपणे एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करण्यात धन्यता मानत आहेत.तटस्थ भूमिका : पक्षाला घातकजयंत पाटील यांनी आजवर पक्षांतर्गत संघर्षात घेतलेली तटस्थ भूमिकाच पक्षासाठी घातक ठरत आली आहे. दोन पदाधिकारी किंवा नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला, तर त्या दोन्ही डगरीवर हात ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. ठामपणे सर्वांना डोस देण्याची भूमिका त्यांनी कधी घेतली नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आताही दोन्ही गटांवर अधिकारवाणी गाजविली नाही, तर संघर्ष आणि त्या माध्यमातून पक्षीय नुकसान अटळ आहे.वाद नेमका कशाचा?पक्षांतर्गत दोन गटांमध्ये निर्माण झालेला वाद हा वेगळ्या कारणासाठी आहे. नेत्यांनी सर्वांना समान वागणूक देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत काही नेते त्यांच्या अगदी जवळचे, तर काही ठराविक अंतरावरचे आहेत. त्यामुळे अंतरावरील कार्यकर्त्यांना या गोष्टी रुचत नाहीत. नेमकी हीच गोष्ट वादाला कारणीभूत ठरत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जयंतरावांची कसरत होणार आहे.