शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

राजू शेट्टींनी हवेतले आरोप करू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा प्रसंग टाळण्यासाठी पंचगंगा नदीचे पाणी बोगद्यातून राजापूर बंधाऱ्यापर्यंत सोडण्याचा विचार होता. राजू शेट्टींना हे ...

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा प्रसंग टाळण्यासाठी पंचगंगा नदीचे पाणी बोगद्यातून राजापूर बंधाऱ्यापर्यंत सोडण्याचा विचार होता. राजू शेट्टींना हे सर्व नको असेल तर ते काम आपण रद्द करू, पण त्यांनी हवेतले आरोप करू नयेत, अशी टीका जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बाेलताना केली.

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्याकडून पंचगंगा परिक्रमा पदयात्रा व मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, पूरग्रस्त शेतकऱ्यांना चांगली मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही जलदगतीने होणार आहे. शासनाने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे शेट्टींना मोर्चा, पदयात्रा काढण्याची गरज नाही.

ते म्हणाले की, महापुरावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी करण्यासाठी कोल्हापुरातून राजापूर बांधाऱ्यापर्यंत बोगद्याने पंचगंगा नदीचे पाणी सोडण्याच्या प्रकल्पाचा विचार सुरू असल्याबाबत आपण मत मांडले होते. यावर शेट्टी यांनी आक्षेप घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रसंग टाळण्यासाठी जनहिताचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेट्टींना जर अशाप्रकारचा प्रकल्प नको असेल, तर तो आपण रद्द करू.

महापुराचा नागरिकांना वारंवार होणारा त्रास थांबावा, त्यावर कायमस्वरूपी चांगला तोडगा काढावा म्हणून शासन सर्व बाजूंनी विचार करीत आहेत. अनेक प्रस्ताव यासाठी येत आहेत. बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा विचारही पुढे आला होता. त्याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर लगेचच शेट्टी यांनी आरोप केले. अशाप्रकारचे आरोप त्यांनी बंद करावेत, असे ते म्हणाले.