शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

राजू शेट्टींनी हवेतले आरोप करू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा प्रसंग टाळण्यासाठी पंचगंगा नदीचे पाणी बोगद्यातून राजापूर बंधाऱ्यापर्यंत सोडण्याचा विचार होता. राजू शेट्टींना हे ...

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा प्रसंग टाळण्यासाठी पंचगंगा नदीचे पाणी बोगद्यातून राजापूर बंधाऱ्यापर्यंत सोडण्याचा विचार होता. राजू शेट्टींना हे सर्व नको असेल तर ते काम आपण रद्द करू, पण त्यांनी हवेतले आरोप करू नयेत, अशी टीका जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बाेलताना केली.

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्याकडून पंचगंगा परिक्रमा पदयात्रा व मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, पूरग्रस्त शेतकऱ्यांना चांगली मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही जलदगतीने होणार आहे. शासनाने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे शेट्टींना मोर्चा, पदयात्रा काढण्याची गरज नाही.

ते म्हणाले की, महापुरावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी करण्यासाठी कोल्हापुरातून राजापूर बांधाऱ्यापर्यंत बोगद्याने पंचगंगा नदीचे पाणी सोडण्याच्या प्रकल्पाचा विचार सुरू असल्याबाबत आपण मत मांडले होते. यावर शेट्टी यांनी आक्षेप घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रसंग टाळण्यासाठी जनहिताचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेट्टींना जर अशाप्रकारचा प्रकल्प नको असेल, तर तो आपण रद्द करू.

महापुराचा नागरिकांना वारंवार होणारा त्रास थांबावा, त्यावर कायमस्वरूपी चांगला तोडगा काढावा म्हणून शासन सर्व बाजूंनी विचार करीत आहेत. अनेक प्रस्ताव यासाठी येत आहेत. बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा विचारही पुढे आला होता. त्याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर लगेचच शेट्टी यांनी आरोप केले. अशाप्रकारचे आरोप त्यांनी बंद करावेत, असे ते म्हणाले.