शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

राजू शेट्टी, जयंत पाटील यांचे ‘टार्गेट’ सदाभाऊ : भाजपसमोरही खोत यांचाच पर्याय उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:09 IST

हातकणंगले लोकसभा आणि इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण लढणार? यावर आजही भाजप, शिवसेनेपुढे ठोस असे उत्तर नाही. परंतु शेट्टी आणि

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभेचे राजकारण

अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा आणि इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण लढणार? यावर आजही भाजप, शिवसेनेपुढे ठोस असे उत्तर नाही. परंतु शेट्टी आणि पाटील यांच्याविरोधात सदाभाऊ खोत हेच उमेदवार असावेत, जेणेकरून लढत रंगेल, अशाच भावना राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमटू लागल्या आहेत.

वाळवा - शिराळ्यात राष्ट्रवादीविरोधात भाजपची जबाबदारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे आली आहे. शिराळ्यात भापजकडे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ताकद आहे. परंतु मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे आमदार नाईक गट अस्वस्थ आहे. दुसरीकडे भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि स्वाभिमानी पक्षाचे नारायण राणे महाडिक गटाला ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खोत यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपच्या नेत्यांना इस्लामपूर मतदारसंघ महत्त्वाचा वाटतो. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे कोणत्याही परिस्थितीत पानिपत करण्याचा डाव भाजपने आखला आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शेट्टी यांच्याविरोधात तगडा उमेदवार आजही भाजपकडे नाही. यावर पर्याय म्हणून शिवसेनेत नुकतेच आलेले धैर्यशील माने यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. परंतु शेट्टी यांच्याविरोधात सदाभाऊ खोत हेच उमेदवार असावेत, अशी इच्छा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

जशी अवस्था लोकसभा मतदार संघाची आहे, तशीच अवस्था इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचीही आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपकडे तगडा उमेदवार नाही. पहिल्या टप्प्यात मंत्री खोत यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये घेऊन आमदारकीची स्वप्ने दाखवली आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु याला मंत्री खोत यांचा हिरवा कंदील नाही. त्यातच महाडिक गटाची भूमिकाही महत्त्वाही आहे. जुने भाजपचे नेते विक्रमभाऊ पाटील हे सुद्धा निशिकांत पाटील यांचे नेतृत्व मानत नाहीत. त्यामुळे भाजपची ताकद विभागली गेली आहे.

पेठनाक्यावरील महाडिक गट जयंत पाटील यांचे पारंपरिक विरोधक असल्याचे मानतात. परंतु शिराळा आणि इस्लामपूर मतदारसंघात महाडिक गट कार्यरत आहे. जास्त करून शिराळा मतदारसंघात या गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे सम्राट महाडिक यांनी विधानसभा लढवण्याचा निर्धार केला आहे, तर त्यांचे बंधू राहुल महाडिक यांना इस्लामपूर मतदार संघात स्वारस्य आहे. त्यामुळे आजही महाडिक गटाची भूमिका अस्पष्ट असल्यासारखी जाणवते, असे राजकीय जाणकारांना वाटते.

यावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील हे महाडिक गटाशी संपर्क ठेवून आहेत, तर जयंत पाटील यांच्याविरोधात वैभव नायकवडी यांच्यासारखे नेतृत्व भाजपमध्ये घेण्याचा डाव आखला जात आहे. दुसरीकडे वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी यांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सध्या तरी जयंत पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार नाही. म्हणूनच खोत यांनी विधानसभा लढवावी आणि आपली ताकद दाखवावी, अशीही हवा मतदारसंघात वाहू लागली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली