शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

राजेंद्रअण्णांसमोर विरोधक हतबल!

By admin | Updated: June 11, 2015 00:25 IST

माणगंगा, सूतगिरणीवर वर्चस्व : सेना-भाजपला दुहीचा फटका

अविनाश बाड - आटपाडी -मागील महिन्याभरात आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना आणि बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी या दोन मोठ्या संस्थांच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले होते. अखेर या दोन्ही संस्थांवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविली. आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत रंग आणला, पण माघार घेतली, तर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारांना मात्र सभासदांनी नाकारले. राजेंद्रअण्णांच्या या डबल धमाक्याने देशमुख गटाच्या विरोधकांची गोची झाली आहे. माणगंगा कारखाना स्थापनेपासून यंदा प्रथमच एवढी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपनेही पॅनेल उभे केले. उमेदवारी अर्जासोबत ऊस उत्पादक शेतकरी असल्याच्या पूर्ततेबाबत थेट उच्च न्यायालयापर्यंत काहींनी धाव घेतली. त्यामुळे यंदाची निवडणूक अभूतपूर्व होण्याची चिन्हे निर्माण झाली. शिवसेना आणि भाजप यांची युती शेवटपर्यंत झाली नाही. मात्र गोपीचंद पडळकर यांनी ‘एकला चलो रे’ म्हणत प्रचारसभांचा धडाका लावला.देशमुख गटाच्या विरोधात हे दोन गट एकत्र आले असते, तर कारखान्याच्या निवडणुकीनंतर एका गटाचे अस्तित्व संपुष्टात आले असते. राजेंद्रअण्णांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले. त्यांना सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक साळुंखे यांनीही साथ दिली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा झाल्या. दुष्काळाचे वारंवार संकट येऊनही, प्रसंगी टँकरने पाणी आणून कारखाना चालविणाऱ्या राजेंद्रअण्णांना सभासदांनी निवडणुकीत साथ दिली.सूतगिरणीचीही यंदा प्रथमच निवडणूक झाली. भाजपच्या पडळकरांचे परिवर्तन पॅनेल आणि राजेंद्रअण्णांचे शेतकरी पॅनेल या दुरंगी सामन्यात देशमुख गटाने पुन्हा गुलाल उधळला. साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ वाचले असले तरी, सूतगिरणीच्या निवडणुकीत दोन उमेदवार वगळता इतरांचे ‘डिपॉझिट’ही जप्त झाले. या संस्थांच्या निवडणुकीत देशमुखांच्या पुढच्या पिढीतील हर्षवर्धन आणि दिग्विजय या तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी या दुष्काळी भागातील संस्थांवर निवडणुकीच्या खर्चाचा बोजा नको, म्हणून सामोपचाराने बिनविरोध निवडणुका करण्याचा कल असलेल्या राजेंद्रअण्णांनी निर्विवाद विजय मिळविला. असे असले तरी, या प्रस्थापितांशी कसलीही तडजोड न करता ठामपणे निवडणुकांना सामोरे जाणारे भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेमुळे तालुक्याच्या राजकीय संघर्षात वाढ झाली, एवढे मात्र नक्की. तालुक्यात आलेल्या ‘टेंभू’च्या पाण्यामुळे तालुक्याबरोबर साखर कारखान्याच्या उसाचा दुष्काळही कायमचा संपण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखाना आणि सूतगिरणीला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.