शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

राजेंद्रअण्णांसमोर विरोधक हतबल!

By admin | Updated: June 11, 2015 00:25 IST

माणगंगा, सूतगिरणीवर वर्चस्व : सेना-भाजपला दुहीचा फटका

अविनाश बाड - आटपाडी -मागील महिन्याभरात आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना आणि बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी या दोन मोठ्या संस्थांच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले होते. अखेर या दोन्ही संस्थांवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविली. आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत रंग आणला, पण माघार घेतली, तर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारांना मात्र सभासदांनी नाकारले. राजेंद्रअण्णांच्या या डबल धमाक्याने देशमुख गटाच्या विरोधकांची गोची झाली आहे. माणगंगा कारखाना स्थापनेपासून यंदा प्रथमच एवढी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपनेही पॅनेल उभे केले. उमेदवारी अर्जासोबत ऊस उत्पादक शेतकरी असल्याच्या पूर्ततेबाबत थेट उच्च न्यायालयापर्यंत काहींनी धाव घेतली. त्यामुळे यंदाची निवडणूक अभूतपूर्व होण्याची चिन्हे निर्माण झाली. शिवसेना आणि भाजप यांची युती शेवटपर्यंत झाली नाही. मात्र गोपीचंद पडळकर यांनी ‘एकला चलो रे’ म्हणत प्रचारसभांचा धडाका लावला.देशमुख गटाच्या विरोधात हे दोन गट एकत्र आले असते, तर कारखान्याच्या निवडणुकीनंतर एका गटाचे अस्तित्व संपुष्टात आले असते. राजेंद्रअण्णांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले. त्यांना सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक साळुंखे यांनीही साथ दिली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा झाल्या. दुष्काळाचे वारंवार संकट येऊनही, प्रसंगी टँकरने पाणी आणून कारखाना चालविणाऱ्या राजेंद्रअण्णांना सभासदांनी निवडणुकीत साथ दिली.सूतगिरणीचीही यंदा प्रथमच निवडणूक झाली. भाजपच्या पडळकरांचे परिवर्तन पॅनेल आणि राजेंद्रअण्णांचे शेतकरी पॅनेल या दुरंगी सामन्यात देशमुख गटाने पुन्हा गुलाल उधळला. साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ वाचले असले तरी, सूतगिरणीच्या निवडणुकीत दोन उमेदवार वगळता इतरांचे ‘डिपॉझिट’ही जप्त झाले. या संस्थांच्या निवडणुकीत देशमुखांच्या पुढच्या पिढीतील हर्षवर्धन आणि दिग्विजय या तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी या दुष्काळी भागातील संस्थांवर निवडणुकीच्या खर्चाचा बोजा नको, म्हणून सामोपचाराने बिनविरोध निवडणुका करण्याचा कल असलेल्या राजेंद्रअण्णांनी निर्विवाद विजय मिळविला. असे असले तरी, या प्रस्थापितांशी कसलीही तडजोड न करता ठामपणे निवडणुकांना सामोरे जाणारे भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेमुळे तालुक्याच्या राजकीय संघर्षात वाढ झाली, एवढे मात्र नक्की. तालुक्यात आलेल्या ‘टेंभू’च्या पाण्यामुळे तालुक्याबरोबर साखर कारखान्याच्या उसाचा दुष्काळही कायमचा संपण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखाना आणि सूतगिरणीला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.