राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या तिप्पेहळ्ळी - जत युनिट कार्यस्थळावर सांगता समारंभात तोडणी मुकादम व कंत्राटदारांचा सत्कार देवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्तिक पाटील, आर. डी. माहुली, एस. डी. कोरडे, सुदाम पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जत-तिप्पेहळळी युनिटमध्ये यावर्षी १ लाख ५५ हजार ६९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ५२ हजार ७७० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. पुढच्या वर्षी या युनिटमध्ये तीन ते साडेतीन लाख टन उसाचे गाळप करायचे आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, राजारामबापू कारखान्याचे संचालक देवराज पाटील यांनी केले. राजारामबापू सहकारी साखर कारखाना हा सहकारी क्षेत्रातील ब्रँड नेम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजारामबापूच्या तिप्पेहळ्ळी- जत युनिटच्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी संचालक कार्तिक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजीव सावंत, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सरव्यवस्थापक एस. डी. कोरडे, मुख्य अभियंता सुदाम पाटील उपस्थित होते.
यावेळी साखराळेचे सरपंच बाबूराव पाटील, चंद्रकांत पाटील, अरविंद पाटील, नंदकिशोर पाटील, अभिजित शिंदे, विकास पाटील तसेच ऊस तोडणी वाहतूक मुकादम महादेव माने, महादेव गाढवे, मायाप्पा मल्लार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यवस्थापकीय अधिकारी व्ही. बी. पाटील, शेती अधिकारी नितीन पाटील, पंकज पाटील, भिकू मदने यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुख्य वेळापाल निवास कुंभार यांनी आभार मानले.