शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
5
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
6
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
7
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
8
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
9
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
10
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
11
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
12
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
13
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
14
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
15
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
16
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
17
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
18
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
19
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
20
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

राजारामबापूंचे चरित्र नव्या पिढीसमोर यायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST

इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कार्य व चरित्र अधिक जोमाने राज्याच्या कानाकोपऱ्यांत आणि नव्या पिढीसमोर न्यायला हवे, अशी ...

इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कार्य व चरित्र अधिक जोमाने राज्याच्या कानाकोपऱ्यांत आणि नव्या पिढीसमोर न्यायला हवे, अशी भावना आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. देशाच्या पंतप्रधानांनी स्व. बापूंचे चरित्र अभ्यासावे, त्यांना देशातील शेतकऱ्यांचे हित कसे जोपासावे? याचे ज्ञान मिळेल, असा टोलाही त्यांनी दिला.

राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, विजयराव पाटील, शरद लाड, मनोज शिंदे, अविनाश पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.

आ. मिटकरी म्हणाले, बापूंनी ज्ञानगंगा खेड्या-पाड्यात नेली. लोक संपर्काचे प्रभावी साधन म्हणून पदयात्रा काढल्या. त्यांनी मोठा विरोध असतानाही १४ महिन्यांत साखर कारखाना उभा करून तालुक्याचे नंदनवन बनविले आहे. त्यांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला आहे. त्यांचे चरित्र व चारित्र्य स्वच्छ होते, विरोधकही त्यांचा आदर करीत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या खाते पुस्तिकेचे प्रणेते बापू आहेत.

जयंत पाटील यांनी उत्स्फूर्तपणे आ. मिटकरी यांची ओळख करून दिली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण निर्मिती करण्यात आ. अमोल मिटकरी, खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे योगदान मोलाचे आहे. आम्ही एकत्रित संपूर्ण राज्यात फिरलो, त्यांचे प्रत्येक भाषण एकावेसे वाटायचे. आशय तोच, मात्र सांगण्याची ढब वेगवेगळी असायची. ते माझे जवळचे मित्र बनले आहेत.

पी. आर. पाटील, सभापती शुभांगी पाटील, बाळासाहेब पाटील, भरत देशमुख, छाया पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, बाळासाहेब होनमारे, दत्ताजी पाटील, नेताजीराव पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, सुस्मिता जाधव, रोझा किणीकर, शंकरराव भोसले उपस्थित होते. उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी- १७०१२०२१-राजारामबापू व्याख्यान न्यूज १ व २

राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयंत पाटील, प्रतीक पाटील, मनोज शिंदे, शरद लाड, विजयराव पाटील उपस्थित होते.