शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’साठी पवनचक्क्या उभारा

By admin | Updated: October 3, 2015 23:49 IST

खानापुरातील ४० ग्रामसभांचा ठराव : कृती समितीच्या आवाहनास प्रतिसाद

विटा : शासनाने टेंभू योजनेच्या विजेसाठी खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर पवनचक्क्या व सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत, अशा मागणीचा ठराव शुक्रवारी खानापूर तालुक्यातील सुमारे ४० गावांच्या ग्रामसभेत करण्यात आला. खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला असून, टेंभूच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांच्या समावेशासाठीही शुक्रवारी वंचित गावांनी ग्रामसभेत ठराव करून हे ठराव शासन व कृष्णा खोरे विकास महामंडळाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळी खानापूर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या टप्पा क्र. ३ अ, ३ ब, तसेच टप्पा क्र. ४ व ५ मधून शेतकऱ्यांना विद्युत पंपाव्दारे पाणी उचलून द्यावे लागणार आहे. त्यामुळे वीज बिल व अन्य खर्च विचारात घेता टेंभूची पाणीपट्टी आकारणी जास्त होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर हा ठराव करण्यात आला. खानापूर तालुक्यातील काही गावे टेंभू योजनेपासून वंचित आहेत, तर अनेक गावांना पूर्णपणे या योजनेच्या पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे टेंभू योजनेतील दोष दुरूस्त करावेत तसेच वंचित गावे व लाभक्षेत्राचा समावेश टेंभू योजनेत करावा, यासाठी खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीने तालुक्यात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. श्विाय टेंभू योजनेच्या विजेसाठी पवनऊर्जा व सौरऊर्जा प्रकल्प उभारून त्याचा खर्च टेंभू प्रकल्प खर्चात समाविष्ट करावा, अशी मागणी कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत कृती समितीने शुक्रवार, दि. २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत याबाबतचे ठराव मंजूर करून घेऊन शासन व कृष्णा खोरे विकास मंडळाला पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार खानापूर तालुक्यातील सुमारे ४० गावांनी ग्रामसभेत टेंभू योजनेत समावेश व पवनऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत ठराव घेऊन ते एकमताने मंजूर केले. हे सर्व ठराव खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीच्यावतीने शासनाला पाठविण्यात येणार आहेत. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास किंवा वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश न झाल्यास रस्त्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी ग्रामसभेत घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)