शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

राज्य शासनाच्या दरबारी सांगलीचा पाऊस भारी!

By admin | Updated: October 11, 2015 00:13 IST

म्हणे, जादा पावसाचा जिल्हा! : ७६ ते १०० टक्के गटात समावेश

अंजर अथणीकर / सांगली मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्यात ७६ ते १०० टक्के पाऊस नोंदला गेला. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये मात्र सरासरीच्या तुलनेत ६९ टक्केच पाऊस झाला आहे. शासन दरबारी नोंदवलेल्या पावसावरच आता नियोजन होणार असल्यामुळे याचा फटका जिल्ह्यातील उपाययोजनांना बसणार आहे. शासनाकडून ७६ ते १०० टक्के पाऊस झालेल्या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याबरोबरच धुळे, नंदुरबार, अहमनगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया या तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६९.४ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४२ टक्क्याहून कमी पाऊस यंदा झाला आहे. ऐन पावसाळ्यात सध्या ५० हून अधिक टँकर सुरु आहेत. जिल्ह्यातील यावर्षी आटपाडी वगळता एकाही तालुक्याने सरासरी ओलांडलेली नाही. सर्वाधिक सरासरी पावसाची नोंद आटपाडी तालुक्यात झाली आहे. या तालुक्याची सरासरी ३५५ मि. मी. असून, प्रत्यक्षात २९५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडीची सरासरी टक्केवारी १००.३ टक्के आहे. त्याखालोखाल खानापूर व शिराळा या दोन तालुक्यात पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यात सरासरी ६४.२ व ६४ टक्के पाऊस बरसला आहे. वाळवा, तासगाव व कवठेमहांकाळ या तीन तालुक्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. शिराळा तालुक्यातही यंदा पाऊसमान कमी आहे. सर्वात कमी पावसाची नोंद वाळवा तालुक्यात झाली आहे. भीषण पाणीटंचाई : टंचाई आराखडा वाढला जिल्ह्यात सरासरी कमी पाऊस झाल्यामुळे जत, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांचा १३ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे विद्युत बिल भरण्यासाठी नऊ कोटींची आणि टँकर, विहिरी व कूपनलिका अधिग्रहण करण्यासाठी चार कोटींच्या निधीची गरज आहे. संभाव्य टँकर ८० हून अधिक लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.