शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

इस्लामपूरच्या विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: November 19, 2015 00:26 IST

भाजप, राष्ट्रवादीचे दिन सारखेच : सत्ताधाऱ्यांमध्येही मतभेद

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर इस्लामपूर शहराच्या विकासाला गती केव्हा येणार, यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील आणि त्यांच्या पालिकेतील सत्ताधारी समर्थकांनी शहराच्या विकासाबरोबरच स्वत:चा विकास मोठ्या प्रमाणात केला असल्याची चर्चा आहे. विकास करताना विकास आराखड्यात सर्वसामान्यांच्या घरांवर नांगर फिरवले आहेत. भाजपच्या राज्यात तरी अच्छे दिन येतील, असे वाटत होते. परंतु तसे काहीही घडले नाही. नगरपालिकेच्या राजकारणात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत मतभेद आहेत. त्यामुळे नियोजित विकास आराखड्यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी आघाडी शासनात काम करताना इस्लामपूर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या पैशातून इस्लामपूर शहराची बारामती करण्याचा त्यांचा संकल्प त्यांच्याच समर्थकांनी मोडीत काढला आहे. २00३ चा विकास आराखडा सर्वसामान्य जनतेच्या सोयीचा आणि स्मार्ट सिटी बनविण्यासाठी उपयोगी ठरावा, हे डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला होता. परंतु यामध्ये शहरातील बहुतांशी घरे आणि विरोधकांना टार्गेट करुन त्यांच्या मालमत्तांवर आरक्षणे टाकण्यात आली होती. याला सर्व स्तरातून विरोध झाल्याने हा विकास आराखडा रद्द करण्यात आला. त्यानंतर विविध समित्या नेमून नवीन विकास आराखडा करण्यात आला असून, तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मते हा विकास आराखडा काही दिवसातच मंजूर होऊन तो प्रसिध्द केला जाणार आहे. तरीसुध्दा सत्ताधारी आणि विरोधकांतील काही मंडळी शहरातील धनदांडग्या भूखंड माफीयांच्या सुपाऱ्या घेऊन मुंबई वाऱ्या करु लागले आहेत. तसेच विरोधकांनी या विकास आराखड्यामध्ये बहुतांशी लोकांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केल्यामुळे, आराखड्याला अंतिम मंजुरी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचे समजते. सत्ताधारी व विरोधकांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांना मात्र अच्छे व बुरे दिन सारखेच झाले आहेत. मंत्रीपद : चर्चाच अधिक शिराळ्याचे भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळण्याची हवा चांगलीच झाली आहे. त्यामुळे आगामी काळात इस्लामपूरच्या विकास आराखड्याचे काय करायचे ते आम्ही ठरवू, अशी चर्चा विरोधी गटातून आहे.  

विकास आराखडा मंजूर होऊन तो मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे. सध्या आमच्याकडे सत्ता नाही. त्यामुळे विरोधकांनी धमक असेल तर स्वत:च्या ताकदीचा वापर करुन विकास आराखडा मंजूर करुन आणावा. - विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपरिषद.  

अन्यायकारक विकास आराखडा रद्द झालाच पाहिजे. परंतु तो सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर करुन शासनाकडे पाठविला आहे. कायदेशीररित्या तो आराखडा रद्द करता येतो की नाही, याबद्दल शंका आहे. कारण लाखो रुपये खर्च करुन २00३ चा विकास आराखडा रद्द केला आहे. - विजय कुंभार, विरोधी पक्षनेते, इ. न. पा.