शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: November 19, 2015 00:26 IST

भाजप, राष्ट्रवादीचे दिन सारखेच : सत्ताधाऱ्यांमध्येही मतभेद

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर इस्लामपूर शहराच्या विकासाला गती केव्हा येणार, यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील आणि त्यांच्या पालिकेतील सत्ताधारी समर्थकांनी शहराच्या विकासाबरोबरच स्वत:चा विकास मोठ्या प्रमाणात केला असल्याची चर्चा आहे. विकास करताना विकास आराखड्यात सर्वसामान्यांच्या घरांवर नांगर फिरवले आहेत. भाजपच्या राज्यात तरी अच्छे दिन येतील, असे वाटत होते. परंतु तसे काहीही घडले नाही. नगरपालिकेच्या राजकारणात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत मतभेद आहेत. त्यामुळे नियोजित विकास आराखड्यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी आघाडी शासनात काम करताना इस्लामपूर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या पैशातून इस्लामपूर शहराची बारामती करण्याचा त्यांचा संकल्प त्यांच्याच समर्थकांनी मोडीत काढला आहे. २00३ चा विकास आराखडा सर्वसामान्य जनतेच्या सोयीचा आणि स्मार्ट सिटी बनविण्यासाठी उपयोगी ठरावा, हे डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला होता. परंतु यामध्ये शहरातील बहुतांशी घरे आणि विरोधकांना टार्गेट करुन त्यांच्या मालमत्तांवर आरक्षणे टाकण्यात आली होती. याला सर्व स्तरातून विरोध झाल्याने हा विकास आराखडा रद्द करण्यात आला. त्यानंतर विविध समित्या नेमून नवीन विकास आराखडा करण्यात आला असून, तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मते हा विकास आराखडा काही दिवसातच मंजूर होऊन तो प्रसिध्द केला जाणार आहे. तरीसुध्दा सत्ताधारी आणि विरोधकांतील काही मंडळी शहरातील धनदांडग्या भूखंड माफीयांच्या सुपाऱ्या घेऊन मुंबई वाऱ्या करु लागले आहेत. तसेच विरोधकांनी या विकास आराखड्यामध्ये बहुतांशी लोकांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केल्यामुळे, आराखड्याला अंतिम मंजुरी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचे समजते. सत्ताधारी व विरोधकांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांना मात्र अच्छे व बुरे दिन सारखेच झाले आहेत. मंत्रीपद : चर्चाच अधिक शिराळ्याचे भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळण्याची हवा चांगलीच झाली आहे. त्यामुळे आगामी काळात इस्लामपूरच्या विकास आराखड्याचे काय करायचे ते आम्ही ठरवू, अशी चर्चा विरोधी गटातून आहे.  

विकास आराखडा मंजूर होऊन तो मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे. सध्या आमच्याकडे सत्ता नाही. त्यामुळे विरोधकांनी धमक असेल तर स्वत:च्या ताकदीचा वापर करुन विकास आराखडा मंजूर करुन आणावा. - विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपरिषद.  

अन्यायकारक विकास आराखडा रद्द झालाच पाहिजे. परंतु तो सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर करुन शासनाकडे पाठविला आहे. कायदेशीररित्या तो आराखडा रद्द करता येतो की नाही, याबद्दल शंका आहे. कारण लाखो रुपये खर्च करुन २00३ चा विकास आराखडा रद्द केला आहे. - विजय कुंभार, विरोधी पक्षनेते, इ. न. पा.