शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-तुंग रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:56 IST

सांगली : मरणयातनांचा अनुभव देणाऱ्या सांगली-तुंग या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा पेटला असून, विविध सामाजिक संघटनांनी याविषयी संताप व्यक्त ...

सांगली : मरणयातनांचा अनुभव देणाऱ्या सांगली-तुंग या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा पेटला असून, विविध सामाजिक संघटनांनी याविषयी संताप व्यक्त केला. मंत्री, खासदार, आमदार तसेच जबाबदार अधिकाºयांच्या कुटुंबियांनीच आता याप्रश्नी संबंधितांना जाब विचारावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचतर्फे करण्यात आले आहे.‘लोकमत’ने या रस्त्याच्या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर नेते, अधिकारी खडबडून जागे झाले. नागरिक जागृती मंचने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. शेवटी या गोष्टीची दखल घेत शासनाला हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट करावा लागला. रस्त्याचे तीन टप्प्यातील काम सुरू होते. दोन टप्पे पूर्ण झाले असले तरी, सांगली-तुंग हा पट्टा अद्याप दुरुस्त झालेला नाही. प्रचंड नरकयातना सहन करीत प्रवासी या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेत अधिकाºयांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रस्ते कामास तातडीने सुरुवात करण्याचा निर्णय झाला.भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी या रस्तेकामाचा नारळ थाटात फोडला. त्यासाठी मोठा कार्यक्रम घेऊन निधी आणल्याचा गाजावाजा केला. उद्घाटनानंतर दुसºयादिवशी लगेच कामास सुरुवात होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र या रस्त्याने त्यानंतर ना खडी पाहिली ना डांबर. होते ते खड्डे अधिकच अक्राळ-विक्राळ रूप धारण करीत आहेत.सुरुवातीला पॅचवर्क करून, महिनाभर पावसाळ्यासाठी प्रवाशांची सोय करण्यात येईल, त्यानंतर मंजूर निविदेप्रमाणे साडेसहा कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पॅचवर्क सुरू झाले.पॅचवर्क झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुख्य कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घाईगडबडीत भाजप नेत्यांनी आटोपला, पण त्यानंतर त्याची सुरुवात झाली की नाही, हे पाहण्याची तसदीही घेतली नाही.वाहनाचे चाक तुटलेसांगलीतील संतोष माळी हे शनिवारी सांगली-तुंग रस्त्यावरून कारने जात होते. त्यावेळी खड्ड्याचा दणका बसल्याने कारचे चाक तुटून सात फुटावर जाऊन पडले. या अपघातात ते थोडक्यात बचावले. नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी याविषयी संताप व्यक्त करताना, या अपघाताची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली आहेत.पावसाळाही संपला..!इतके महिने केवळ पावसाळा असल्याने काम करता येत नसल्याचे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देत होते. आता शासकीय दप्तरी पावसाळा संपल्यानंतरही त्यांना हे काम सुरू करता आले नाही. आता कोणते कारण ते देणार आहेत, असा सवाल संघटनांच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे.