शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पलूस तालुक्याला अवकाळीचे ग्रहण!

By admin | Updated: March 23, 2015 00:38 IST

क्षारपड जमिनीच्या क्षेत्रात वाढ : चौदा हजार एकरातील द्राक्षबागा भुईसपाट

आर. एन. बुरांडे - पलूस -संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला, तरी कृषिसंपन्न आणि सधनतेची दैवी देणगी लाभलेला कृष्णा-येरळा यांच्या कुशीतील पलूस तालुका मात्र दुष्काळापासून नेहमीच कोसोदूर राहिलेला आहे. परंतु अलीकडे मात्र अवकाळी पाऊस आणि क्षारपड जमिनीमुळे पलूस तालुक्यालाही ग्रहण लागले आहे.कृष्णा-येरळा या नद्यांच्या कुशीतील पलूस तालुक्यात खासगी आणि सहकारी पाणी योजनांमुळे शेत शिवाराची इंच न् इंच जमीन ओलिताखाली आली आहे. त्यातून फुललेली समृध्दीची हिरवळ हे पलूस तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. तालुका ३४ गावांचा आहे. पैकी एक, दोन गावांचा अपवाद वगळता उरलेली सर्व गावे कृषिसंपन्न आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ २७४४५.८३ हेक्टर आहे. पैकी लागवडीखालील क्षेत्र २४६९६ हेक्टर आहे, तर बागायती क्षेत्र १८११३.५५ हेक्टर आहे आणि कोरडवाडू क्षेत्र केवळ ६५८० हेक्टर आहे. तालुक्यात प्रामुख्याने ऊस, द्राक्षे, सोयाबीन, ज्वारी,गहू, हरभरा, मका, हळद, भुईमूग, केळी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. लहानशा या तालुक्यात द्राक्षशेती १४ हजार एकरावर केली जाते. पलूस तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४८०.२ इतके आहे. मात्र बारमाही प्रवाहित कृष्णा नदीमुळे आणि शेती योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असल्याने तालुक्यातील भूजल पातळी बाराही महिने समाधानकारक असते. तालुक्यात एकसुध्दा धरण नाही अथवा तलाव नाही. तरीसुध्दा तालुका कृषिसंपन्न झाला आहे.शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, शेडनेटच्या साहाय्याने फूलशेती, फळभाजी याशिवाय चाऱ्याच्या मुबलकतेमुळे पशुधनसुध्दा मोठे आहे. अशा या समृध्द पलूस तालुक्याला आता अवकाळी पावसाने अक्षरश: धुऊन काढले आहे. १४ हजार एकरावरील द्राक्षशेती फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. बागांचा एकरी खर्च वाढला आहे. शासनाच्या पंचनाम्याचे किचकट निकष यामुळे बागायतदारांना भरपाई देण्यात अडचणी येत आहेत. या अवकाळीमुळे बेदाण्याचा दर्जा खालावला आहे. रब्बी पिकांपैकी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकरी अक्षरश: हबकला आहे. बेभरंवशाची शेती करण्यापेक्षा अन्य शेतीकडे वळण्याचा शेतकऱ्यांचा कल दिसून येऊ लागला आहे. तालुक्यातील अवकाळीमुळे पीकनिहाय बाधित झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे- द्राक्षे ३०८.७६, गहू १०.९०, ज्वारी २३.२१, हरभरा २०.२३२, हळद १.८०.कृषिसंपन्न पलूस तालुक्याचे अवकाळी पाऊस मोठे नुकसान करीत असताना, पाण्याच्या अतिवापराने आणि शेतीच्या पारंपरिक पध्दतीमुळे तालुक्याला क्षारपडचा प्रश्न तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, वसगडे, आमणापूर, दुधोंडी, पुणदी, नागराळे, धनगाव गावांना सतावू लागला आहे. तालुक्यात क्षारपडचे क्षेत्र ६८२४.४४ हेक्टर एवढे आहे. यात हळूहळू वाढ होत आहे. या कृषिसंपन्न तालुक्याला अवकाळीने आणि क्षारपड प्रश्नाने जेरीस आणले आहे. तालुक्यातील शेतकरी मात्र हतबल झाला आहे. अवकाळीमुळे बेदाण्याचा दर्जा खालावला आहे. रब्बी पिकांपैकी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात अवकाळीमुळे द्राक्षाचे ३०८.७६, गहू १०.९०, ज्वारी २३.२१, हरभरा २०.२३२, तर हळदीचे १.८० हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. बागांचा एकरी खर्च वाढला आहे. शासनाच्या पंचनाम्याचे किचकट निकष यामुळे बागायतदारांना भरपाई देण्यात अडचणी येत आहेत.