शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:29 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सामान्य माणूस आरोग्य संपन्न राहीला तर त्याचे संपूर्ण कुटूंब सुखी व सुदृढ रहाते म्हणून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची सर्वोतोपरी दक्षता घेण्यात येत आहे, असे सांगून सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्व रूग्णांलयामधून सर्वसामान्य गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्यासांगली महानगरपालिकेच्या रूग्णालयाचे उद्घाटन

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सामान्य माणूस आरोग्य संपन्न राहीला तर त्याचे संपूर्ण कुटूंब सुखी व सुदृढ रहाते म्हणून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची सर्वोतोपरी दक्षता घेण्यात येत आहे, असे सांगून सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्व रूग्णांलयामधून सर्वसामान्य गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी नवीन 10 प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी निधी उपलब्ध होवून 50 हजार लोकसंख्येकरिता एक या प्रमाणे 10 प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. यातील विश्रामबाग सांगली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आजारपणामध्ये रूग्णांना डॉक्टरांचा खूप मोठा आधार असतो. त्यामुळे रूग्णांशी आपुलकीने संवाद साधा. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे याची जाणीव ठेवून त्यांना सेवा द्या असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, आजारपणामध्ये उपचार करण्याबरोबरच माणसे आजारीच पडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृतीही करा. आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक गोरगरीबाला 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही खूप मोठ्या प्रमाणावर गरजूंना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व योजनांचा गरजूंना लाभ मिळवून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.खासदार संजय पाटील म्हणाले, केंद्र शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी 10 कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे या क्षेत्रातील गोरगरीबांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रानी सांगली सिव्हील हॉस्पीटलचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रूग्णांना सेवा द्यावी.महापौर संगीता खोत यांनी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या 10 पैकी 8 प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत 2 आरोग्य केंद्रांचे कामही लवकरच पूर्ण होईल असे सांगून या सर्व आरोग्य केंद्रामधून परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत नागरिकांना मोफत बाह्यरूग्ण सेवा, बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, संदर्भ सेवा, गरोदर माता व 0 ते 5 वयोगटातील बालकांची तपासणी व औषधोपचार, साथरोग सर्व्हेक्षण व उपचार, सामान्य प्रयोगशाळा तपासणी सुविधा, किरकोळ औषधोपचार, कुटूंब कल्याण शस्त्रक्रीया मार्गदर्शन व सल्ला, कुटूंब नियोजन पध्दती मार्गदर्शन, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, नियमित लसीकरण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जिवनसत्व अ व जंतनाशक मोहीम, कुटूंब कल्याण कार्यक्रम, आरोग्य विषयक सल्ला केंद्र, किशोरवयीन मुलामुलींना सल्ला व मार्गदर्शन, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आदि सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत.प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार संजय कुलकर्णी यांनी मानले. यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगली