शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

इस्लामपूरच्या विकासाचा हिशेब द्या

By admin | Updated: January 16, 2015 23:41 IST

विरोधकांना नामोहरम करू

अशोक पाटील -इस्लामपूर  शहरात कोट्यवधी रुपयांचा विकास झाला आहे. त्या झालेल्या विकासाचा अगोदर चुकता हिशेब द्या, नंतरच निकृष्ट दर्जाच्या विकास कामांचे उद्घाटन करा, असे आव्हान भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाटील व विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी सत्ताधाऱ्यांना ‘लोकमत’शी बोलताना दिला.पाटील व कुंभार म्हणाले, इस्लामपूर शहरात झालेल्या विकासाचा भकास झाला आहे. चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेला पोहण्याचा तलाव भुईसपाट झाला आहे. कोट तलावाचे काम बंद आहे. नवीन केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांवर १५ दिवसात खड्डे पडले आहेत. उद्घाटन होत असलेल्या व्यापारी संकुलनाचे चुकीच्या पध्दतीने टेंडर काढण्यात आले आहे. महादेवनगर येथील घरकुलांची अवस्था दयनीय झाली आहे. भुयारी गटार योजनेचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. २४ बाय ७ पाणी योजना अद्यापही अधांतरीच आहे.अत्याधुनिक सिग्नल, डिजिटल लायब्ररी, वायफाय योजनेच्या फक्त घोषणाच झाल्या आहेत. अन्यायकारक विकास आराखडा अद्यापही शासनदरबारी प्रलंबित आहे. सर्व्हेसाठी पालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली आहे. चौकांच्या सुशोभिकरणाचा पत्ता नाही. शहरातील वाहतूक कोंडी सर्वसामान्यांसाठी जीवघेणी बनली आहे. शतकोटी वृक्षारोपणाचे तीनतेरा वाजले आहेत, असाही आरोप कुंभार व पाटील यांनी केला.नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांचा दर्जा तपासून पाहण्याची गरज आहे. त्याचा अगोदर त्यांनी हिशेब द्यावा. आता केंद्रात व राज्यात सत्ता आमची आहे. त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या विकासकामांचे आम्ही बघून घेऊ. येणाऱ्या निवडणुकीत सत्ता आमचीच आहे. तेव्हा विकास कशाला म्हणतात, हे आम्ही सर्वांना दाखवून देऊ, असाही इशारा विरोधकांनी दिला आहे.विरोधकांना नामोहरम करूयाबाबत सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील म्हणाले की, या विरोधकांना हिशेब मागण्याचा अधिकार कोणी दिला?, त्यासाठी किती पगार दिला जातो? पाटलाच्या वाड्यावर जेवणाचं आवतन न देता पंगतीला बसणाऱ्या विरोधकांची काय ताकद आहे? आम्ही केलेल्या विकास कामांची मापे काढण्याचा तुमचा प्रांत नाही, त्यामुळे तो प्रयत्न करू नका, पालिकेच्या आगामी निवडणुकीत २८ पैकी २८ जागा जिंकून विरोधकांना नामोहरम करून त्यांची जागा दाखवून देऊ, असेही ते म्हणाले.