शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रायगडावर सावरकरांच्या नाटकाच्या आयोजनाबद्दल मराठा सेवा संघाकडून निषेध

By संतोष भिसे | Updated: June 4, 2023 18:14 IST

राज्य शासन राज्यात दंगली घडवू पाहत असल्याचा आरोपही करण्यात आला.

सांगली : रायगडावर सहा जून रोजी ३४९ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सागरा प्राण तळमळला हे नाटक सादर केले जाणार आहे. मराठा सेवा संघाने याचा तीव्र निषेध केला असून विरोध दर्शविला आहे. राज्य शासन राज्यात दंगली घडवू पाहत असल्याचा आरोपही करण्यात आला.

संघाची मासिक बैठक रविवारी (दि. ४) सांगलीत झाली. यावेळी यावेळी डॉ. संजय पाटील, अमृतराव सूर्यवंशी, नितीन चव्हाण, श्रीरंग पाटील, संजय सावंत, प्रणिता पवार आदी उपस्थित होते. दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीमाई फुले यांचे पुतळे हटवल्याबद्दलही तीव्र निषेध यावेळी करण्यात आला.

डॉ. पाटील म्हणाले की, रायगडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवारी (दि. ६) ३४९ वा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. २ ते ६ जूनदरम्यान विविध कार्यक्रम होत आहेत. ६ जूनरोजी शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष सुरु होत आहे. पण शासनाने एक वर्ष अगोदरच ३५० वा सोहळा साजरा केला. जनतेला चुकीची माहिती सांगून संभ्रम निर्माण केला गेला.

सूर्यवंशी म्हणाले, सावरकरांनी शिवराज्याभिषक म्हणजे काकतालीय योग असल्याची उक्ती केली होती. कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडल्याप्रमाणे शिवाजी महाराज राजे झाले असेही लिहिले आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्या सावरकरांचे नाटक मुद्दाम रायगडावर सादर करण्यात येणार आहे. याबद्दल राज्य शासनाचा निषेध आहे. बैठकीला मारुती शिंदे, अर्चना कदम, आशा पाटील, युवराज शिंदे, प्रताप पाटील, देवजी साळुंखे हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, सेवा संघाच्या बैठकीत केंद्र शासनाचाही निषेध करण्यात आला. दिल्लीतील महिला पैलवानांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला.  केंद्र सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष करुन खासदार ब्रिजभूषणला पाठीशी घातल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Raigadरायगड