शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कामेरी तालुक्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित

By admin | Updated: November 27, 2014 00:22 IST

रघुनाथ हळदे-पाटील : आष्टा, पेठ तालुका करण्याची मागणी चुकीची

कामेरी : वाळवा तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र कामेरी तालुका करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असताना आष्टा किंवा पेठ तालुका व्हावा, अशी मागणी करणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कामेरी तालुक्याची मागणी करणारे मुख्य प्रवर्तक रघुनाथ हळदे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.याबाबत बोलताना हळदे-पाटील म्हणाले, वाळवा तालुक्याचे विभाजन करून वेगळा तालुका निर्माण करण्याबाबत राज्य शासनाने ३१/५/२00९ पूर्वी प्रस्ताव सादर करावेत, असा जाहीरनामा काढला होता. शासनाने दिलेल्या मुदतीत फक्त कामेरी तालुका होण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला गेल्याने इतर गावांचा तालुका म्हणून विचार होणार नाही. त्यानुसार शासनाकडून कामेरी तालुका का व्हावा, याबाबत काही मुद्द्यांचा खुलासा १0/५/२0१२ रोजी मागण्यात आला होता. त्यामध्ये कामेरी तालुका करण्याचा हेतू, कामेरी तालुक्यात नेमक्या कोणत्या गावांचा समावेश असावा, त्याचा नकाशा, इस्लामपूर-कामेरी अंतर ३ ते ४ कि. मी. असताना नवीन तालुका होण्याकामी ग्रामसभेचा ठराव, समाविष्ठ गावांची संमत्ती आहे का? या बाबींचा खुलासा मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. तसेच स्वतंत्र कामेरी तालुका होण्याकामी प्रयत्न करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांनाही निवेदने दिली आहेत. तर १५/८/२00९ रोजी कामेरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गावातील व परिसरातील लोकांना प्रत्येक कामासाठी इस्लामपूरला जावे लागू नये म्हणून नवीन कामेरी तालुका करावा व तालुक्याचे ठिकाण कामेरी गावात व्हावे, याबाबतचा ठराव करण्यात आला आहे.कामेरी तालुका होण्यासाठी सर्वती कागदपत्रे योग्य नमुन्यामध्ये शासनाकडे पाठविली असल्याने लवकरच वाळवा तालुक्याचे विभाजन होऊन कामेरी तालुका अस्तित्वात येईल, असा विश्वास हळदे-पाटील यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)कामेरी तालुका कधी अस्तित्वात येईल?कामेरी तालुक्यात नेमक्या कोणत्या गावांचा समावेश असावा, त्याचा नकाशा, इस्लामपूर-कामेरी अंतर ४ कि. मी. असताना नवीन तालुका होण्याकामी ग्रामसभेचा ठराव, समाविष्ट गावांची संमती आहे का? याचा अहवाल मंडल अधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे.