शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

साखर उत्पादन १ कोटी क्विंटलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:22 IST

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी दि. १० एप्रिलअखेर ७९ लाख टन उसाचे गाळप करुन ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, मागील दहा वर्षातील हे विक्रमी गाळप आहे. दहा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले असून पाच कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसात बंद होणार ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी दि. १० एप्रिलअखेर ७९ लाख टन उसाचे गाळप करुन ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, मागील दहा वर्षातील हे विक्रमी गाळप आहे. दहा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले असून पाच कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसात बंद होणार आहेत. यावर्षी प्रथमच जिल्ह्यातील कारखाने एक कोटी क्विंटल साखरेचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने असले तरी, यशवंत, डफळे आणि तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम दोन वर्षापासून बंदच आहेत. उर्वरित १५ साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगामाला सुरुवात केली. चार महिने अखंडित गळीत हंगाम घेऊन ७९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. वसंतदादा (सांगली), राजारामबापू पाटील (साखराळे, ता. वाळवा), विश्वास (चिखली, ता. शिराळा), महांकाली (कवठेमहांकाळ), राजारामबापू (वाटेगाव, ता. वाळवा), राजारामबापू (सर्वोदय युनिट, कारंदवाडी, ता. वाळवा), मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), निनाईदेवी (दालमिया, कोकरुड, ता. शिराळा), उदगिरी शुगर अँड पॉवर (बामणी-पारे, ता. खानापूर), सद्गुरु श्री श्री शुगर (राजेवाडी, ता. आटपाडी) या दहा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. सध्या हुतात्मा (वाळवा), माणगंगा (आटपाडी), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव) आणि केन अ‍ॅग्रो (डोंगराई, ता. कडेगाव) या पाच कारखान्यांचे गळीत हंगाम आठवडाभर चालू राहणार आहेत. या कारखान्यांमध्ये जवळपास तीन ते चार लाख टन उसाचे गाळप होऊन पाच ते सहा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होणार आहे. म्हणजेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा एक कोटी क्विंटल साखरेचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. यावर्षी दहा वर्षातील विक्रमी गाळप होणार असल्याचेही कारखानदारांचे मत आहे.राजारामबापू साखराळे युनिटने जिल्ह्यातील सर्वाधिक गाळप करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सर्वात कमी गाळप माणगंगा साखर कारखान्याचे असून तेथे आतापर्यंत केवळ ८३ हजार २२४ टन उसाचे गाळप करुन ६९ हजार ९२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये : महावीर पाटीलजिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी मार्चचा पूर्ण महिना आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या उसाची बिले शेतकºयांना दिलेली नाहीत. तसेच सर्वच साखर कारखानदारांनी साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून एफआरपीनुसार बिलेच दिली नाहीत. साखर कारखानदारांनी सरकारकडे भांडावे आणि अनुदान घ्यावे, काहीही करावे, पण शेतकºयांना शंभर टक्के बिले द्यावीत, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोल छेडावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी दिला आहे.जिल्ह्यातील गळीत हंगामाची सद्यस्थिती...कारखाना ऊस गाळप (मे. टन) साखर उत्पादन (क्विं.) उतारा टक्केवसंतदादा ७१३६७० ८५१६७० ११.९३राजारामबापू (साखराळे) १००८१८० १२८७००० १२.७७विश्वासराव नाईक ५३३९५५ ६४४००० १२.०६हुतात्मा ६८३४४० ८७७५०० १२.८४माणगंगा ८३२२४.७ ६९९२५ ८.४०महांकाली १८२४८० १९४७७० १०.६७राजारामबापू (वाटेगाव) ५३२५३०९ ६७०७०० १२.५९सोनहिरा ९१५२४५ ११३९२५० १२.४५क्रांती ९०४३१० १११३९५० १२.३२सर्वोदय ४१९१३९.९ ५२८००० १२.६०मोहनराव शिंदे ३७०२८५ ४२२६१० ११.४१निनाईदेवी (दालमिया) १४७४९१ १८२३५० १२.३६केन अ‍ॅग्रो ३७४१४० ४५६१६० १२.१९उदगिरी शुगर ४६१०२० ५४३४०० ११.७९सद्गुरु श्री श्री शुगर ५०३२३७.५ ५८३४०० ११.५६एकूण ७८३२३४९ ९६१२०८५ १२.२१