शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जतमध्ये दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 17, 2014 23:40 IST

खरीप हंगाम वाया : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

दरीबडची : जूनच्या अखेरीसह मान्सून पावसाने दिलेली हुलकावणी, पाणी पातळीत झालेली घट, कोरडे पडलेले तलाव यामुळे जत तालुक्यातील दुष्काळाची भीषणता अधिक गडद झाली आहे. तालुक्यात आजअखेर केवळ २३ टक्केच खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, पावसाअभावी पेरण्या लांबल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे स्पष्ट होत असताना पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.सांगली जिल्ह्याच्या इतर भागात मान्सून पाऊस सुरु आहे. परंतु, जत तालुक्याकडे सध्याही मान्सून पावसाने पाट फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तालुक्यातील २६ तलावांपैकी १८ तलाव कोरडे पडले आहेत. ८ तलावांमध्ये १७.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने १५ दिवसांत लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिथं पाणी आहे त्या तलावातील पाणीही लवकरच संपण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आली आहे. तालुक्यातील पाणी टंचाई ही सर्वात गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्याने प्रशासनही हादरले आहे. पाणी व चारा टंचाईने तालुक्यातील जनता मेटाकुटीला आली आहे.जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या अवकृपेने १८७२ पासून कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कुंभारी परिसरातील गावांमध्ये पाण्याची सुकाळ परिस्थिती आहे. त्या परिसरातील तलावांना थोड्या प्रमाणात पाणीसाठा आहे.मान्सून पाऊस येण्याच्या कालावधितच एप्रिल-मे हिटप्रमाणे ऊन पडल्यामुळे कोवळी पिके वाळून गेली आहेत. पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटापर्यंत गेली आहे. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेतकरी मोठ्याप्रमाणात विहिरी व कूपनलिका खोदू लागला आहे. पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने डाळिंबाच्या बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी कमी पडले, तर चांगल्या प्रतीच्या काड्या तयार होणार नाहीत.तलावात पाणीसाठा नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी उपशाला बंदी घालण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पुन्हा घामाच्या धारा वहात आहेत. तालुक्यातील सोरडी, सनमडी, येळवी, रेवनाळ, मिरवाड, अंकलगी हे तलाव आणि संख मध्यम प्रकल्प, दोड्डनाला मध्यम प्रकल्पही कोरडे पडले आहेत. (वार्ताहर)