शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

जतमध्ये दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 17, 2014 23:40 IST

खरीप हंगाम वाया : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

दरीबडची : जूनच्या अखेरीसह मान्सून पावसाने दिलेली हुलकावणी, पाणी पातळीत झालेली घट, कोरडे पडलेले तलाव यामुळे जत तालुक्यातील दुष्काळाची भीषणता अधिक गडद झाली आहे. तालुक्यात आजअखेर केवळ २३ टक्केच खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, पावसाअभावी पेरण्या लांबल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे स्पष्ट होत असताना पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.सांगली जिल्ह्याच्या इतर भागात मान्सून पाऊस सुरु आहे. परंतु, जत तालुक्याकडे सध्याही मान्सून पावसाने पाट फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तालुक्यातील २६ तलावांपैकी १८ तलाव कोरडे पडले आहेत. ८ तलावांमध्ये १७.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने १५ दिवसांत लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिथं पाणी आहे त्या तलावातील पाणीही लवकरच संपण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आली आहे. तालुक्यातील पाणी टंचाई ही सर्वात गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्याने प्रशासनही हादरले आहे. पाणी व चारा टंचाईने तालुक्यातील जनता मेटाकुटीला आली आहे.जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या अवकृपेने १८७२ पासून कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कुंभारी परिसरातील गावांमध्ये पाण्याची सुकाळ परिस्थिती आहे. त्या परिसरातील तलावांना थोड्या प्रमाणात पाणीसाठा आहे.मान्सून पाऊस येण्याच्या कालावधितच एप्रिल-मे हिटप्रमाणे ऊन पडल्यामुळे कोवळी पिके वाळून गेली आहेत. पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटापर्यंत गेली आहे. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेतकरी मोठ्याप्रमाणात विहिरी व कूपनलिका खोदू लागला आहे. पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने डाळिंबाच्या बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी कमी पडले, तर चांगल्या प्रतीच्या काड्या तयार होणार नाहीत.तलावात पाणीसाठा नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी उपशाला बंदी घालण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पुन्हा घामाच्या धारा वहात आहेत. तालुक्यातील सोरडी, सनमडी, येळवी, रेवनाळ, मिरवाड, अंकलगी हे तलाव आणि संख मध्यम प्रकल्प, दोड्डनाला मध्यम प्रकल्पही कोरडे पडले आहेत. (वार्ताहर)