शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

वेगवान इंटरनेट सेवेच्या बाजारपेठेवर खासगी कंपन्यांची मक्तेदारी, बीएसएनएलला फोरजी सेवेस परवानगीची मागणी

By संतोष भिसे | Updated: March 13, 2023 18:06 IST

लाखो ग्राहक नाईलाजाने बीएसएनएल सोडून गेले

सांगली : खासगी मोबाईल कंपन्यांची फोर जी सेवा सुरू होऊन १० वर्षे झाली. आता फाईव्ह जी सुध्दा सुरू केली आहे. मात्र सरकारी मालकीच्या बीएसएनएलच्या फोर जी सेवेस अजूनही दीड वर्षे लागतील असे सांगण्यात येत आहे. यामुळे वेगवान इंटरनेट सेवेच्या बाजारपेठेवर खासगी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याची टिका एनएफटीई (नॅशनल फेडरेशन ऑफ टेलीफोन एम्प्लॉईज) संघटनेचे महासचिव चन्देश्वर सिंग यांनी केली. बीएसएनएलला स्पर्धेतून बाहेर करण्याचे सरकारी धोरण ग्राहकांच्या हिताचे नाही असेही ते म्हणाले.अहमदनगर येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. बीएसएनएलची फोर जी व फाईव्ह जी सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, सरकारी धोरणांमुळे संपूर्ण टेलिकॉम क्षेत्र खासगी उद्योगपतींच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या फोर जी सेवेचा सरकारचा अट्टाहास बीएसएनएलच्या दुर्दशेला कारणीभूत ठरत आहे.

स्वदेशीचा निर्णय व सुरु असलेल्या चाचण्या स्वागतार्ह असल्या, तरी त्यामुळे लाखो ग्राहक नाईलाजाने बीएसएनएल सोडून गेले आहेत याकडेही लक्ष द्यायला हवे. ८० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने प्रशिक्षित मनुष्यबळाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे अनेक सेवा कंत्राटदारांकडे गेल्या. कंत्राटी कामगारांचे शोषण तीव्र झाले. सेवेचा दर्जा खालावला. परिणामी बीएसएनएलच्या असंख्य लॅंडलाईन जोडण्या बंद झाल्या.सिंग म्हणाले, आज कंपनीमध्ये एक अधिकारी तीन-चार विभागांची जबाबदारी सांभाळत आहे. नवीन कनेक्शन, दुरुस्त्या, ग्राहक सेवा केंद्र यासाठी कर्मचारी नाहीत. त्यामुळे नव्याने भरती आवश्यक आहे. कोरोनाकाळात सेवेदरम्यान २०० हून अधिक कर्मचारी मरण पावले. त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत देण्याऐवजी अनुकंपा भरती बंद केली आहे. कर्मचाऱ्यांना पाच वर्षांनंतरही वेतन आयोग दिलेला नाही. यावेळी राज्याध्यक्ष सी. जे. जगताप, सचिव रंजन दाणी, का. वा. शिरसाट, शिवाजी चव्हाण, अमृत माने, अशोक हिंगे, राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक जाधव, मानसिंगराव पाटील, उल्हास जावळेकर, राम निंबाळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीBSNLबीएसएनएल