शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरतीत मानधन, बदली कामगारांना प्राधान्य

By admin | Updated: June 12, 2017 01:04 IST

हारुण शिकलगार : पदोन्नतीचा प्रश्नही सोडविणार; महापालिका कामगारांचा सांगलीत मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच किमान वेतनाचा लढा यशस्वी ठरला आहे. आता कर्मचाऱ्यांची पदोन्नती व बदली महिला कर्मचाऱ्यांना किमान पंधरा दिवस काम देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. भविष्यात नोकरभरतीमध्ये मानधन व बदली कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन महापौर हारूण शिकलगार यांनी रविवारी केले. सांगलीतील तरूण भारत क्रीडांगणाच्या सभागृहात महापालिका कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, पुणे महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट्ट, मुंबई कचरा वाहतूक श्रमिक संघाचे विजय दळवी, कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष अमित ठाकर, सचिव दिलीप शिंदे, सहसचिव विजय तांबडे उपस्थित होते. शिकलगार म्हणाले की, किमान वेतनप्रश्नी कामगारांनी एकी दाखविली. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली. काहीजणांचा विरोध असतानाही किमान वेतनाचा ठराव मंजूर केला. बदली महिला कर्मचाऱ्यांना महिनाभर काम मिळत नाही, हे शरमेची बाब आहे. त्यांना किमान पंधरा दिवस काम मिळावे, यासाठी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. कचरा वाहतुकीवरील खर्च कमी करण्यासाठी चार प्रभागात वर्गीकरणाचा विचार सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल. पालिकेचे क्षेत्रफळ पाहता, साडेचार हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या २३०० कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षात नोकरभरती झालेली नाही. या नव्या भरतीत मानधन व बदली कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विजय दळवी म्हणाले की, मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूरनंतर किमान वेतन मिळणारी सांगली ही पाचवी महापालिका आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये किमान वेतनाचा अध्यादेश जारी झाला आहे. त्यामुळे आता त्यातील फरकासाठी लढा उभा करावा. नियमित कामाचा ठेका देऊ नये, अशी कायद्यात तरतूद आहे. तरीही सफाई, रुग्णालयातील कामासाठी कंत्राटी कामगार नियुक्त केले जातात. याविरूद्ध रस्त्यावरच्या व कायद्याच्या लढाईसाठी तयार व्हा, असे आवाहन त्यांनी केले. उदय भट्ट यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार अनेक कायदे बदलत आहे. त्यामुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्याऐवजी, कोणी काय खायचे, कपडे कोणते घालायचे, यावरच चर्चा होते, असा टोलाही त्यांनी लगाविला. यावेळी शेडजी मोहिते, विजय तांबडे यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास सलीम मुजावर, एकनाथ माळी, सूर्यकांत सूर्यवंशी गौतम कांबळे, चंद्रकांत बाणदार, सुशिला भोरे, मनीषा पाटील, सविता कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.