शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार कारखान्यांचा परवाना रोखणार

By admin | Updated: September 4, 2014 00:03 IST

साखर आयुक्तांचा निर्णय : वसंतदादा, तासगाव साखर कारखान्यांचा प्रश्न गंभीर

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २०१३-१४ च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्व थकित बिले देण्याची कारखाना प्रशासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांची कारखान्याकडे थकबाकी असेल, तर त्या साखर कारखान्यास २०१४-१५ च्या हंगामासाठी गाळप परवाना देण्यात येणार नाही, असा इशारा साखर आयुक्तांनी लेखी आदेशाद्वारे दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सर्व कारखान्यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वसंतदादा आणि तासगाव साखर कारखान्यांना गळीत हंगामाचा परवाना मिळण्याची शक्यता धूसर आहे.वसंतदादा साखर कारखान्याने २०१३-१४ गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची ४५ कोटींची देणी अद्यापही दिलेली नाहीत. उसाची बिले भागविण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरज तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीसही बजाविली आहे. त्यातच साखर गोदामालाही सील ठोकले आहे. शेतकऱ्यांच्या देणीसोबतच जिल्हा बँकेचेही ७८ कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अद्याप त्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या वर्षीचा गळीत हंगाम घेण्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत प्रस्ताव पाठवायचे आहेत. गाळप परवाना मागताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र त्याला जोडायचे आहे. वसंतदादा कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या उसाची ४५ कोटींची देणी दिली नाहीत. ही थकबाकी दिल्याशिवाय त्यांना गाळप परवाना देणार नसल्याचे आयुक्त कार्यालयाने सांगितले आहे. तासगाव कारखाना सुरू करण्यास राज्य बँकेचाच खोडा असल्यामुळे तो सुरू होणार नाही. शिवाय, शेतकरी आणि कामगारांच्या थकित पगाराचा मुद्दाही गाळप परवान्यावेळी उपस्थित होणार आहेत. या सर्व कारणांमुळे जिल्ह्यातील वसंतदादा आणि तासगाव कारखान्यांना प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडून गाळप परवाना मिळणेच कठीण आहे. (प्रतिनिधी)