शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगली कृष्णा नदी स्वच्छता प्रकल्पाची तयारी : निती आयोगाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:56 IST

निती आयोगाने त्यांच्याच एका अहवालाआधारे देशातील बारमाही नद्यांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करून, स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी नदी

ठळक मुद्देबृहत् आराखड्यानंतर होणार प्रदूषण मुक्तीचे नियोजन

सांगली : निती आयोगाने त्यांच्याच एका अहवालाआधारे देशातील बारमाही नद्यांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करून, स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी नदी म्हणून कृष्णा नदीबाबत बृहत् आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याची तयारी आता सुरू झाली आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांच्यावर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृष्णा नदीतील प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे.याबाबतचा एक अहवाल यापूर्वीच सादर झाला होता. दरवर्षी नदीतील मासे मृत होण्याबरोबरच पाण्यातून होणाऱ्या विविध आजारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. पाण्याच्या गुणवत्ता निर्देशांकात सध्या भारताचा १२२ देशांमध्ये १२० वा क्रमांक आहे. ही बाब स्पष्ट करताना निती आयोगाने नद्या स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यात कृष्णा नदीचाही समावेश करण्यात आला आहे.

सुरुवातीला नदीच्या प्रदूषणाची सद्य:स्थिती, कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण होते, त्याचे परिणाम, सांडपाणी स्वच्छतेबाबतचे प्रकल्प, त्यांची सद्य:स्थिती, एकूणच नदीपात्रातील गेल्या काही वर्षातील बदल, प्रदूषण रोखण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना, त्यावरील खर्च, लोकसहभाग, स्थानिक पातळीवरील शासकीय संस्थांचा सहभाग याविषयीचा सविस्तर उल्लेख या अहवालात असणार आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर गंगा, यमुना या नद्यांप्रमाणेच कृष्णा नदी स्वच्छतेचा प्रकल्पही आखण्यात येईल. त्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे. खासदार संजयकाका पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असल्याने यासंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला असून, आराखड्यासंदर्भात लवकरच बैठक होईल, असे स्पष्ट केले.नदीबद्दलचे अहवालकृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत विविध प्रकारचे अहवाल सादर झाले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत गतवर्षी सादर झालेल्या अहवालानुसार कृष्णा नदीतील जैविक आॅक्सिजन मागणी (बीओडीचे) प्रमाण २०१० मध्येच १० मिलिग्रॅ्रम प्रतिलिटर इतके गंभीर होते. ते २०१६ मध्ये १६ मिलिग्रॅम इतके अतिधोकादायक पातळीवर पोहोचले आहे. मध्यम प्रदूषित नद्यांमध्ये याचे प्रमाण २ ते ८ मानले जाते, तर त्यावरील प्रमाण अत्यंत गंभीर मानले जाते. त्यामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. याला नद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी आणि कारखान्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी कारणीभूत आहे.कृष्णा नदीची वैशिष्ट्ये...देशातील चौथी सर्वात मोठी नदीगंगा, गोदावरी, ब्रम्हपुत्रानंतर क्रमांकएकूण प्रवास १३०० किलोमीटरमहाबळेश्वरजवळील पश्चिम घाटांमध्ये उगममहाराष्टÑ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून प्रवासजवळपास १५ उपनद्या कृष्णेला मिळतातजिल्ह्यातील प्रदूषणाची सद्य:स्थितीप्रतिदिन नदीत मिसळणारे शहरातील सांडपाणी : ५ कोटी ६० लाख लिटरएमआयडीसीमधून मिसळणारे सांडपाणी : १ कोटी लिटरप्रदूषणाची ठिकाणे...आयर्विन पुलाजवळचा दक्षिण घाटसांगलीवाडीशेरीनाला (वसंतदादा स्मारकाजवळ)पाणी पिण्यालायकही नाहीमिरज महाविद्यालयातर्फे २०१५ मध्ये एम. व्ही. पाटील आणि एस. आर. बामणे यांनी तयार केलेल्या अभ्यास अहवालात कृष्णा नदीचे पाणी पिण्यासाठीसुद्धा लायक नाही, असा निष्कर्ष काढला होता. पाण्यातील बॅक्टेरिया (रोगाचे सूक्ष्मजंतूचे) प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी कॉलरा, डायरिया, गॅस्ट्रो व अन्य पाण्यातून होणाºया आजारांचे प्रमाणही वर्षागणिक वाढल्याचे यात म्हटले आहे.