शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 14:34 IST

survey Manoli Kolhapur Sangli :  आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या  पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू  असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षांनी हा भाग नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

ठळक मुद्देमानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा

विकास शहाशिराळा :  आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू  असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षांनी हा भाग नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आंबा या गावापासून विशाळगडाच्या रस्त्यावर तीन कि.मी. अंतरावरील मानोली गाव पर्यटन स्थळ पश्चिम महाराष्ट्राचे मानबिंदू ठरावे असे आहे . ब्रिटिशांनी १० एप्रिल १८०२ रोजी भारताच्या त्रिकोनमितीय सर्वेक्षणाला सुरुवात केली. सन १८०० मध्ये झालेल्या म्हैसुर विजयानंतर ब्रिटिशांचा लेफ्टनंट विलियम लॅम्बटन यांनी भारतातील भू - भागाचे अचूक सर्व्हेक्षण करण्याची आवश्यकता ब्रिटिश प्रशासनाकडे कळवली.ब्रिटिशांनी आरंभलेल्या त्रिकोतमितीय सर्वेक्षणात दोन ठिकाणांना जोडणाऱ्या एका आधाररेषेवरुन ( बेस लाईन ) तिसऱ्या ठिकाणाकडे होणारे कोन मोजले जात आणि त्यांची स्थाननिश्चिती केली जात असे. या प्रकल्पाच्या सुरुवातीची आधाररेषा मद्रास जवळील सेंट थामस माऊंट आणि पेरुमबक्कम यातील १२ किमी लांबीची रेषा होती. दुसरी आधाररेषा बैंगलोर येथे १८०४ मध्ये लेफ्टनंट वारन यांनी निर्धारित केली. १८०६ कोईमतूर , १८०८ तजांवर , १८० ९ तिनवेल्ली , १८२२ हैद्राबाद येथपर्यंत ही रेषा पुढे वाढविण्यात आली. दुसरीकडून दक्षिण- पश्चिम बाजूने अँड्यू स्काऊट वा यांनी १८६१ पर्यंत गोव्यापासून ते कराचीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण केले.या सर्वेक्षणास ' द गेट दीयोमेट्रीक सर्वे ऑफ इंडिया ' असे नाव दिले. ब्रिटिशांनी आपली वसाहतवादी धोरणे राबवण्यासाठी हे सर्वेक्षण केले असले तरी, संपूर्ण भारताचे मानचित्र , देशाची समृध्दता अचूकतेने शास्त्रीय पद्धतीने अधोरेखित झाले हेच या सर्व्हेक्षणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे .१८४२ मध्ये जेव्हा स्कार कोकणातून सर्वेक्षण करत आंबा घाट पार करून आला . तेव्हा, त्रिमितबिंदू निश्चित होईना. उदगिरी , विशाळगड , कासार्डे अशा अनेक ठिकाणी चाचपणी करून अखेर , स्थानिकांच्या मदतीने मानोली येथे हा बिंदू निर्धारित केला गेला. मानोली येथील त्रिमितबिंदूमुळे , कोल्हापूर , सांगली , सातारा , पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची स्थाननिश्चिती झाली. पुढे याच आधारावर कराचीपर्यंत जमीन मोजणी करण्यात आली .सन १८४२ साली ख्रिसमस साजरा करुन स्कॉट याने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानोली येथून नव्या कामाची सुरुवात केली . या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महसूल विभागाच्या वतीने या वारसास्थळावर पांढरा ध्वज फडकवला जातो. मानोली येथील त्रिमितबिंदू हे वारसास्थळ आहे. येथील डोंगराच्या कड्याना मोठ्या भेगा पडल्या आहेत तर काही भाग खचत चालला आहे, त्यामुळे भूमापनाच्या प्रारंभाचे स्मरण करताना या वारसास्थळाचे संवर्धन करुन नव्या पिढीला याचे महत्त्व समजावण्याचा संकल्प करणे आवश्यक वाटते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगली