शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डाळिंबाचे दर गडगडले उत्पादक नाराज : निर्यात बंदी, पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 19:06 IST

संख : निर्यात बंदी, पाऊस यामुळे डाळिंबाचे दर गडगडल्याने जत तालुक्यातील डाळिंब उत्पादक अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देइतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये डाळिंबाचे उत्पादन यावर्षी मे महिन्यात पाणी नसल्यामुळे बागा कमी होत्या.उशिरा फळधारणा झालेल्या व नोव्हेंबरमध्ये विक्रीला येणाºया डाळिंबाला चांगला दर मिळेल, अशी आशा

गजानन पाटीलसंख : निर्यात बंदी, पाऊस यामुळे डाळिंबाचे दर गडगडल्याने जत तालुक्यातील डाळिंब उत्पादक अडचणीत आला आहे. मालाला बाजारात उठावच नाही, त्यातच लहान फळे असलेल्या बागांवर चिक्की, बिब्ब्या (तेल्या डाग) रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बागेवर केलेला खर्चसुद्धा निघणार नसल्याचे चित्र आहे.

जत तालुक्यातील डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. खडकाळ जमीन, अनुकूल हवामान, कमी पाणी यामुळे क्षेत्रात वाढ झाली आहे. ठिबक सिंचन, शेततलाव, फळबाग अनुदान योजनेतून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, सोन्याळ, जाडरबोबलाद, जालिहाळ खुर्द, उमदी, दरीकोणूर या परिसरात दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे.

इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये डाळिंबाचे उत्पादन येते.यावर्षी अनुकूल हवामान, जुलै, आॅगस्ट महिन्यात झालेला पाऊस यामुळे झाडाला फुले चांगली आली. फळांची अपेक्षित वाढ झाली. मात्र नंतर सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतात पाणीच पाणी झाले. बागेत पाणी साचून राहिल्यामुळे फळे गळून पडली, कुजून गेली. यावर्षी मे महिन्यात पाणी नसल्यामुळे बागा कमी होत्या. जुलै-आॅगस्टमध्ये बाजारात आवक कमी असल्यामुळे गणेश जातीच्या डाळिंबाला ४० ते ५५ रुपये किलो दर होता, तर भगवा डाळिंबाला ६० ते ७० रुपये दर मिळत होता.

उशिरा फळधारणा झालेल्या व नोव्हेंबरमध्ये विक्रीला येणाºया डाळिंबाला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून होता. पण निर्यात बंदी, तसेच चेन्नई येथे सुरू असलेला पाऊस यामुळे दरात घसरण झाली आहे. सध्या बाजारात गणेश डाळिंबाला ५ ते २० रुपये किलो असा दर आहे, तर भगवा डाळिंबाला ३० ते ४५ रुपयांपर्यंत दर आहे. गणेश डाळिंबाला बाजारात उठावच नाही.केंद्र शासनाने डाळिंबावर निर्यातबंदी घातली आहे. त्याचाही फटका डाळिंब व्यापाराला बसला आहे.गणेश डाळिंबाच्या बागा काढण्याची वेळशेतकºयांच्या जुन्या बागा गणेश जातीच्या आहेत. चांगले उत्पादन, कमी खर्च, झाडाची उत्तम प्रतिकारशक्ती यामुळे गणेश डाळिंब बागा लावण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. पण बाजारात त्याला उठावच नाही. व्यापारी माल नको म्हणत असल्याने, दर कमी झाला आहे. त्यामुळे गणेश डाळिंबाच्या बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे.

डाळिंब जात सध्याचे दर आॅगस्ट-सप्टेंबरचे दरगणेश ५ ते २० रुपये (किलो) ४० ते४५भगवा ३० ते ३५ रुपये ६० ते ७० रुपये

 

जत तालुक्यातील डाळिंबाचे दर कमी झालेले आहेत. महागडी औषधे, रासायनिक खते व मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात केला आहे. कमी दरामुळे हा खर्चसुद्धा निघणे मुश्किल आहे. शासनाने लक्ष घालून बागायतदारांना दिलासा द्यावा.- आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक शेतकरी