शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

दुष्काळावरून राजकारण पेटतेय..!

By admin | Updated: October 28, 2015 00:02 IST

वाळवा-शिराळ्यात श्रेयवाद : राजकीय अस्तित्वासाठी रंगलाय नेत्यांचा फड

अशोक पाटील-- इस्लामपूर---यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील काही गावांना पाण्याची कमतरता भासत आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर या तालुक्यांवर पहिल्यांदाच पाण्याचे संकट आले आहे. मात्र या दुष्काळाचे राजकारण शिराळा तालुक्यातील नेत्यांनी पेटवले असून, शेतकऱ्यांपेक्षा श्रेयवादालाच महत्त्व दिले जात आहे. त्यातच आता दोन्ही तालुक्यावर अंकुश ठेवणारे आमदार जयंत पाटील यांनाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.वारणा, कृष्णा खोऱ्यात वसलेल्या वाळवा, शिराळा तालुक्यातील बहुतांशी गावे सुलजाम् सुफलाम आहेत, तर पूर्वेकडील तालुक्यांत दुष्काळाची स्थिती असते. यावर्षी मात्र शिराळा, वाळवा तालुक्यांत दुष्काळाची स्थिती उद्भवली असताना येथील लोकप्रतिनिधींनी स्वत:चे अस्तित्व व श्रेयवादासाठी दुष्काळाचे राजकारण सुरू केले आहे. मोर्चा, आंदोलन, निवेदन देऊन यावर नेमके काय साध्य होणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी एकत्र येऊन या प्रश्नावरून आमदार शिवाजीराव नाईक यांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न चालवला आहे.आमदार शिवाजीराव नाईक यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाळवा, शिराळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचे फेरसर्वेक्षण करून नवीन यादी जाहीर करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे.राज्याच्या राजकारणात पूर्वीपासून सांगली जिल्ह्याचा ठसा उमटत आला आहे. राजकीय श्रेयवादासाठी हा जिल्हा आघाडीवर आहे. शिराळा तालुक्यात होणाऱ्या धरणाचा वाद वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात रंगला होता. अलीकडील काळात वाकुर्डे योजनेचे श्रेय घेण्यासाठी शिराळा, वाळवा तालुक्यातील नेत्यांत स्पर्धा लागली आहे. आता दुष्काळाबाबतही सर्वच नेत्यांनी श्रेयवादासाठी राजकीय फड रंगवला आहे.हेच नेते निवडणूक लढवताना कोट्यवधी रुपयांचा चुरडा करतात. यातील काही भाग दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला तरी वाळवा-शिराळ्यात दुष्काळाच्या झळा जाणवल्या नसत्या. दुष्काळावरून सध्या सुरू असलेले रणकंदन हे फक्त नेत्यांच्या राजकीय अस्तित्वासाठीच असल्याची चर्चा शेतकऱ्यांतून आहे.स्वाभिमानीची चुप्पी : मंत्रीपदाची अपेक्षाभाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते दुष्काळाच्या मदतीसाठी भांडत आहेत, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत मंत्रीपदाच्या अपेक्षेमुळे गप्प आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी फक्त उसाच्या एफआरपीवर बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या तोंडातून दुष्काळावर ‘ब्र’ही निघालेला नाही, हे विशेष!