शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुष्काळावरून राजकारण पेटतेय..!

By admin | Updated: October 28, 2015 00:02 IST

वाळवा-शिराळ्यात श्रेयवाद : राजकीय अस्तित्वासाठी रंगलाय नेत्यांचा फड

अशोक पाटील-- इस्लामपूर---यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील काही गावांना पाण्याची कमतरता भासत आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर या तालुक्यांवर पहिल्यांदाच पाण्याचे संकट आले आहे. मात्र या दुष्काळाचे राजकारण शिराळा तालुक्यातील नेत्यांनी पेटवले असून, शेतकऱ्यांपेक्षा श्रेयवादालाच महत्त्व दिले जात आहे. त्यातच आता दोन्ही तालुक्यावर अंकुश ठेवणारे आमदार जयंत पाटील यांनाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.वारणा, कृष्णा खोऱ्यात वसलेल्या वाळवा, शिराळा तालुक्यातील बहुतांशी गावे सुलजाम् सुफलाम आहेत, तर पूर्वेकडील तालुक्यांत दुष्काळाची स्थिती असते. यावर्षी मात्र शिराळा, वाळवा तालुक्यांत दुष्काळाची स्थिती उद्भवली असताना येथील लोकप्रतिनिधींनी स्वत:चे अस्तित्व व श्रेयवादासाठी दुष्काळाचे राजकारण सुरू केले आहे. मोर्चा, आंदोलन, निवेदन देऊन यावर नेमके काय साध्य होणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी एकत्र येऊन या प्रश्नावरून आमदार शिवाजीराव नाईक यांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न चालवला आहे.आमदार शिवाजीराव नाईक यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाळवा, शिराळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचे फेरसर्वेक्षण करून नवीन यादी जाहीर करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे.राज्याच्या राजकारणात पूर्वीपासून सांगली जिल्ह्याचा ठसा उमटत आला आहे. राजकीय श्रेयवादासाठी हा जिल्हा आघाडीवर आहे. शिराळा तालुक्यात होणाऱ्या धरणाचा वाद वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात रंगला होता. अलीकडील काळात वाकुर्डे योजनेचे श्रेय घेण्यासाठी शिराळा, वाळवा तालुक्यातील नेत्यांत स्पर्धा लागली आहे. आता दुष्काळाबाबतही सर्वच नेत्यांनी श्रेयवादासाठी राजकीय फड रंगवला आहे.हेच नेते निवडणूक लढवताना कोट्यवधी रुपयांचा चुरडा करतात. यातील काही भाग दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला तरी वाळवा-शिराळ्यात दुष्काळाच्या झळा जाणवल्या नसत्या. दुष्काळावरून सध्या सुरू असलेले रणकंदन हे फक्त नेत्यांच्या राजकीय अस्तित्वासाठीच असल्याची चर्चा शेतकऱ्यांतून आहे.स्वाभिमानीची चुप्पी : मंत्रीपदाची अपेक्षाभाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते दुष्काळाच्या मदतीसाठी भांडत आहेत, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत मंत्रीपदाच्या अपेक्षेमुळे गप्प आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी फक्त उसाच्या एफआरपीवर बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या तोंडातून दुष्काळावर ‘ब्र’ही निघालेला नाही, हे विशेष!