शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

वाळवा-शिराळ्यात राजकीय अस्वस्थता

By admin | Updated: January 9, 2015 00:12 IST

विधानसभेनंतरची स्थिती : संस्था आहेत, पण सत्ता नाही अन् सत्ता आहे, पण पद नाही!

अशोक पाटील- इस्लामपूर -लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमंत्रीपदाची स्वप्ने पाहिली. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवाजीराव नाईक यांनी, लाल दिवा मिळणारच, अशा खात्री असल्याने मुंबई वाऱ्या केल्या. सदाभाऊ खोतही मंत्रीपद मिळणारच, अशा वल्गना करत होते. तथापि अपेक्षा फोल ठरल्या. या तिन्ही नेत्यांकडे सक्षम संस्था नाहीत, परंतु राज्यात त्यांची सत्ता आहे. याउलट राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे सक्षम संस्था आहेत, पण सत्ता नसल्याने त्यांच्या भोवतालची गर्दी कमी झाली आहे. सध्या तरी अशी परिस्थिती असल्याने वाळवा-शिराळ्यात राजकीय अस्वस्थता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस दरासंदर्भात एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे. याचा फायदा जिल्ह्यातील साखरसम्राटांनी घेतला आहे. १९०० रुपयांवर कोणीही पहिला हप्ता दिलेला नाही. यामुळे शेट्टी आणि खोत यांची लोकप्रियता घसरत चालली आहे. शिवाजीराव नाईक यांनी विधानसभेपूर्वी मिळविलेल्या लोकप्रियतेवर विजय खेचून आणला आहे. गत हंगामात नाईक यांनी गूळ पावडर व साखर तयार करणारा शिवाजी केन प्रोसेसर्स हा कारखाना सुरू केला आहे. मात्र इतर कारखाने देतील तो दर आम्ही देऊ, असाच पवित्रा त्यांनीही घेतला असून, ऊस उत्पादकाला तेही न्याय देऊ शकलेले नाहीत. याउलट ज्या-ज्या गावात शिवाजीराव नाईक यांना जास्त मते मिळाली आहेत, त्या त्या गावातील ऊस उत्पादकांवर मानसिंगराव नाईक यांच्या विश्वास साखर कारखान्याचे प्रशासन अन्याय करीत असल्याची चर्चा आहे. यामुळे दोन्ही गटात अस्वस्थता आहे.मंत्रीपद मिळविण्यासाठी शिवाजीराव नाईक यांनी अनेक मुंबई वाऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत तीनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु नाईक यांच्या पदरी वेळोवेळी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.दुसरीकडे माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या सर्व संस्था सक्षमपणे सुरू आहेत. त्यांनी आता संस्था आणि मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी सत्तेवर असताना पाटील यांनी सोशल मीडियाला फारसे जवळ केले नव्हते, परंतु सोशल मीडियामुळेच भाजप सत्तेवर आला आहे, असे मत खुद्द त्यांनीच व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्या ते मीडियाच्या संपर्कात राहून अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत.तथापि मंत्रीपद नसल्याने त्यांच्याकडील सर्वसामान्यांचा ओढा कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळेच वाळवा व शिराळा तालुक्यात राजकीय अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.मंत्रीपद मिळविण्यासाठी शिवाजीराव नाईक यांनी अनेक मुंबई वाऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत तीनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु नाईक यांच्या पदरी वेळोवेळी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.सदाभाऊ खोतही मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा धरून आहेत. परंतु, त्यांना संधी मिळाली नसल्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते नाराज आहेत.