शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात राजकीय अस्वस्थता

By admin | Updated: January 9, 2015 00:12 IST

विधानसभेनंतरची स्थिती : संस्था आहेत, पण सत्ता नाही अन् सत्ता आहे, पण पद नाही!

अशोक पाटील- इस्लामपूर -लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमंत्रीपदाची स्वप्ने पाहिली. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवाजीराव नाईक यांनी, लाल दिवा मिळणारच, अशा खात्री असल्याने मुंबई वाऱ्या केल्या. सदाभाऊ खोतही मंत्रीपद मिळणारच, अशा वल्गना करत होते. तथापि अपेक्षा फोल ठरल्या. या तिन्ही नेत्यांकडे सक्षम संस्था नाहीत, परंतु राज्यात त्यांची सत्ता आहे. याउलट राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे सक्षम संस्था आहेत, पण सत्ता नसल्याने त्यांच्या भोवतालची गर्दी कमी झाली आहे. सध्या तरी अशी परिस्थिती असल्याने वाळवा-शिराळ्यात राजकीय अस्वस्थता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस दरासंदर्भात एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे. याचा फायदा जिल्ह्यातील साखरसम्राटांनी घेतला आहे. १९०० रुपयांवर कोणीही पहिला हप्ता दिलेला नाही. यामुळे शेट्टी आणि खोत यांची लोकप्रियता घसरत चालली आहे. शिवाजीराव नाईक यांनी विधानसभेपूर्वी मिळविलेल्या लोकप्रियतेवर विजय खेचून आणला आहे. गत हंगामात नाईक यांनी गूळ पावडर व साखर तयार करणारा शिवाजी केन प्रोसेसर्स हा कारखाना सुरू केला आहे. मात्र इतर कारखाने देतील तो दर आम्ही देऊ, असाच पवित्रा त्यांनीही घेतला असून, ऊस उत्पादकाला तेही न्याय देऊ शकलेले नाहीत. याउलट ज्या-ज्या गावात शिवाजीराव नाईक यांना जास्त मते मिळाली आहेत, त्या त्या गावातील ऊस उत्पादकांवर मानसिंगराव नाईक यांच्या विश्वास साखर कारखान्याचे प्रशासन अन्याय करीत असल्याची चर्चा आहे. यामुळे दोन्ही गटात अस्वस्थता आहे.मंत्रीपद मिळविण्यासाठी शिवाजीराव नाईक यांनी अनेक मुंबई वाऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत तीनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु नाईक यांच्या पदरी वेळोवेळी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.दुसरीकडे माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या सर्व संस्था सक्षमपणे सुरू आहेत. त्यांनी आता संस्था आणि मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी सत्तेवर असताना पाटील यांनी सोशल मीडियाला फारसे जवळ केले नव्हते, परंतु सोशल मीडियामुळेच भाजप सत्तेवर आला आहे, असे मत खुद्द त्यांनीच व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्या ते मीडियाच्या संपर्कात राहून अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत.तथापि मंत्रीपद नसल्याने त्यांच्याकडील सर्वसामान्यांचा ओढा कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळेच वाळवा व शिराळा तालुक्यात राजकीय अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.मंत्रीपद मिळविण्यासाठी शिवाजीराव नाईक यांनी अनेक मुंबई वाऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत तीनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु नाईक यांच्या पदरी वेळोवेळी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.सदाभाऊ खोतही मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा धरून आहेत. परंतु, त्यांना संधी मिळाली नसल्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते नाराज आहेत.