शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

वाळवा-शिराळ्यात राजकीय अस्वस्थता

By admin | Updated: January 9, 2015 00:12 IST

विधानसभेनंतरची स्थिती : संस्था आहेत, पण सत्ता नाही अन् सत्ता आहे, पण पद नाही!

अशोक पाटील- इस्लामपूर -लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमंत्रीपदाची स्वप्ने पाहिली. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवाजीराव नाईक यांनी, लाल दिवा मिळणारच, अशा खात्री असल्याने मुंबई वाऱ्या केल्या. सदाभाऊ खोतही मंत्रीपद मिळणारच, अशा वल्गना करत होते. तथापि अपेक्षा फोल ठरल्या. या तिन्ही नेत्यांकडे सक्षम संस्था नाहीत, परंतु राज्यात त्यांची सत्ता आहे. याउलट राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे सक्षम संस्था आहेत, पण सत्ता नसल्याने त्यांच्या भोवतालची गर्दी कमी झाली आहे. सध्या तरी अशी परिस्थिती असल्याने वाळवा-शिराळ्यात राजकीय अस्वस्थता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस दरासंदर्भात एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे. याचा फायदा जिल्ह्यातील साखरसम्राटांनी घेतला आहे. १९०० रुपयांवर कोणीही पहिला हप्ता दिलेला नाही. यामुळे शेट्टी आणि खोत यांची लोकप्रियता घसरत चालली आहे. शिवाजीराव नाईक यांनी विधानसभेपूर्वी मिळविलेल्या लोकप्रियतेवर विजय खेचून आणला आहे. गत हंगामात नाईक यांनी गूळ पावडर व साखर तयार करणारा शिवाजी केन प्रोसेसर्स हा कारखाना सुरू केला आहे. मात्र इतर कारखाने देतील तो दर आम्ही देऊ, असाच पवित्रा त्यांनीही घेतला असून, ऊस उत्पादकाला तेही न्याय देऊ शकलेले नाहीत. याउलट ज्या-ज्या गावात शिवाजीराव नाईक यांना जास्त मते मिळाली आहेत, त्या त्या गावातील ऊस उत्पादकांवर मानसिंगराव नाईक यांच्या विश्वास साखर कारखान्याचे प्रशासन अन्याय करीत असल्याची चर्चा आहे. यामुळे दोन्ही गटात अस्वस्थता आहे.मंत्रीपद मिळविण्यासाठी शिवाजीराव नाईक यांनी अनेक मुंबई वाऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत तीनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु नाईक यांच्या पदरी वेळोवेळी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.दुसरीकडे माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या सर्व संस्था सक्षमपणे सुरू आहेत. त्यांनी आता संस्था आणि मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी सत्तेवर असताना पाटील यांनी सोशल मीडियाला फारसे जवळ केले नव्हते, परंतु सोशल मीडियामुळेच भाजप सत्तेवर आला आहे, असे मत खुद्द त्यांनीच व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्या ते मीडियाच्या संपर्कात राहून अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत.तथापि मंत्रीपद नसल्याने त्यांच्याकडील सर्वसामान्यांचा ओढा कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळेच वाळवा व शिराळा तालुक्यात राजकीय अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.मंत्रीपद मिळविण्यासाठी शिवाजीराव नाईक यांनी अनेक मुंबई वाऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत तीनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु नाईक यांच्या पदरी वेळोवेळी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.सदाभाऊ खोतही मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा धरून आहेत. परंतु, त्यांना संधी मिळाली नसल्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते नाराज आहेत.