शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

इस्लामपुरातील राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर-सोशल मीडियावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:16 IST

इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत.

ठळक मुद्देएकमेकांची उणी-दुणी काढण्यास सरसावले दोन्ही गटातील कार्यकर्ते

अशोक पाटील ।इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत. याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्येही उमटू लागले आहेत. त्यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे.काँग्रेस आघाडीचे सरकार गेल्यानंतर पाटील यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी देऊन राष्ट्रवादीने त्यांचा सन्मान केला आहे. भाजपची सत्ता आली आणि शेतकरी चळवळीतील नेते सदाभाऊ खोत राज्यमंत्री झाले. याबद्दल पाटील यांनी खोत यांचा सन्मानही केला. परंतु अलीकडील काही महिन्यात खोत आणि काही भाजपमधील नेत्यांनी राष्टÑवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना ‘टार्गेट’ केले. यामुळे खोत आणि पाटील यांच्यातील मतभेद वाढत गेले.दिलीप पाटील यांनी नुकत्याच झालेल्या हल्लाबोल यात्रेत खोत यांचा खरपूस समाचार घेतला. याला खोत आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्युत्तर दिले. मात्र या दोघांमधील आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. दोघांच्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोशल मीडियावर नेऊन त्याला वैयक्तिक स्वरूप दिले आहे.मधील काळात मंत्रीपद मिळाल्यानंतर खोत यांनी राष्ट्रवादीच प्रथम क्रमांकाचा शत्रू मानून आ. जयंत पाटील यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खतपाणी घातले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून खोत यांनी शक्तिप्रदर्शन केले. तेथेही आ. पाटील यांनाच टार्गेट केले जात होते. याचा राग आ. पाटील यांचे समर्थक दिलीपतात्या पाटील यांनी हल्लाबोल यात्रेत काढला. आता पाटील आणि खोत यांच्यात कलगीतुरा रंगला असतानाच, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन हल्लाबोल यात्रेच्या गर्दीवरून टोमणे मारले.दिलीपतात्या पाटील यांनाही टार्गेट केले. आता दोघांच्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोशल मीडियावर नेऊन त्याला वैयक्तिक स्वरूप दिले आहे. पाटील यांचे पुत्र क्रांतिप्रसाद यांनी सोशल मीडियावरून प्रसाद पाटील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. शिवाय रयत क्रांती संघटनेचे गणेश शेवाळे यांचाही समाचार घेतला आहे.सभेच्या गर्दीवरून सुरू झाले युद्धसदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास गर्दी व्हावी, यासाठी बाहेरील लोक आयात केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्याचा वचपा म्हणून हल्लाबोल यात्रेतील गर्दी पाहून हे लोक बाहेरून आणल्याचा पलटवार खोत यांच्या समर्थकांनी केला. यातूनच सध्या सोशल मीडियावर ‘हल्लाबोल’ सुरू झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण