शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर-सोशल मीडियावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:16 IST

इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत.

ठळक मुद्देएकमेकांची उणी-दुणी काढण्यास सरसावले दोन्ही गटातील कार्यकर्ते

अशोक पाटील ।इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत. याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्येही उमटू लागले आहेत. त्यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे.काँग्रेस आघाडीचे सरकार गेल्यानंतर पाटील यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी देऊन राष्ट्रवादीने त्यांचा सन्मान केला आहे. भाजपची सत्ता आली आणि शेतकरी चळवळीतील नेते सदाभाऊ खोत राज्यमंत्री झाले. याबद्दल पाटील यांनी खोत यांचा सन्मानही केला. परंतु अलीकडील काही महिन्यात खोत आणि काही भाजपमधील नेत्यांनी राष्टÑवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना ‘टार्गेट’ केले. यामुळे खोत आणि पाटील यांच्यातील मतभेद वाढत गेले.दिलीप पाटील यांनी नुकत्याच झालेल्या हल्लाबोल यात्रेत खोत यांचा खरपूस समाचार घेतला. याला खोत आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्युत्तर दिले. मात्र या दोघांमधील आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. दोघांच्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोशल मीडियावर नेऊन त्याला वैयक्तिक स्वरूप दिले आहे.मधील काळात मंत्रीपद मिळाल्यानंतर खोत यांनी राष्ट्रवादीच प्रथम क्रमांकाचा शत्रू मानून आ. जयंत पाटील यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खतपाणी घातले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून खोत यांनी शक्तिप्रदर्शन केले. तेथेही आ. पाटील यांनाच टार्गेट केले जात होते. याचा राग आ. पाटील यांचे समर्थक दिलीपतात्या पाटील यांनी हल्लाबोल यात्रेत काढला. आता पाटील आणि खोत यांच्यात कलगीतुरा रंगला असतानाच, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन हल्लाबोल यात्रेच्या गर्दीवरून टोमणे मारले.दिलीपतात्या पाटील यांनाही टार्गेट केले. आता दोघांच्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोशल मीडियावर नेऊन त्याला वैयक्तिक स्वरूप दिले आहे. पाटील यांचे पुत्र क्रांतिप्रसाद यांनी सोशल मीडियावरून प्रसाद पाटील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. शिवाय रयत क्रांती संघटनेचे गणेश शेवाळे यांचाही समाचार घेतला आहे.सभेच्या गर्दीवरून सुरू झाले युद्धसदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास गर्दी व्हावी, यासाठी बाहेरील लोक आयात केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्याचा वचपा म्हणून हल्लाबोल यात्रेतील गर्दी पाहून हे लोक बाहेरून आणल्याचा पलटवार खोत यांच्या समर्थकांनी केला. यातूनच सध्या सोशल मीडियावर ‘हल्लाबोल’ सुरू झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण