शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

‘अस्थिकलश यात्रा’चा प्रयत्न पोलिसांनी रोखला

By admin | Updated: April 12, 2017 00:29 IST

मसूरमधील घटना : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून नोटीस

मसूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा अस्थिकलश घेऊन मसूर ते नागपूर अशी यात्रा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या यात्रेसाठी अस्थिकलश देऊ नये, अशी नोटीसच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याच्या नातेवाइकांना दिली. तसेच अस्थिकलश दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यामुळे नातेवाइकांनी संबंधित पदाधिकाऱ्याला कलश देण्यास नकार दिला.मसूर येथील शेतकरी दामोदर बर्गे यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी बर्गे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत आहेत. अशातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मसूर येथील शेतकऱ्याचा अस्थिकलश घेऊन दुचाकीवरून मसूर ते नागपूर अशी यात्रा काढण्याचे नियोजन मानवाधिकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांनी केले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत हा अस्थिकलश मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठेवण्यात येणार होता. त्यासाठी विजय जाधव यांनी पोलिसांकडे परवानगीही मागीतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. तसेच अस्थिकलश यात्रेसाठी देऊ नये. या प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तसे झाल्यास बर्गे कुटुंबीयांवरच कारवाई केली जाईल, अशी नोटीस पोलिसांनी मयत दामोदर बर्गे यांचा मुलगा विक्रांत व प्रशांत बर्गे यांना दिली. मंगळवारी दुपारी विजय जाधव हे काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मसूरमध्ये आले. त्यांनी बर्गे कुटुंबीयांकडे अस्थिकलशाची मागणी केली. मात्र, कुटुंबीयांनी त्यांना कलश देण्यास नकार दिला. दरम्यान, शिवसेना संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रामभाऊ रैनाक, तालुका उपप्रमुख तात्यासाहेब घाडगे, सतीश पाटील, संजय भोसले, जयवंत पाटील, सुनील पाटील, राजेंद्र घाडगे, दत्तात्रय पवार, भरत चव्हाण आदींनीही मसूर येथे बर्गे कुटुंबीयांची भेट घेतली. याचवेळी अस्थिकलशाच्या कारणावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बर्गे कुटुंबीयांनाच नोटीस बजावल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. शेतकरी कुटुंबीयांना नोटीस देण्याऐवजी ज्यांची कर्जे आहेत त्यांना का नोटीस बजावली नाही, असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना विचारला. त्यामुळेही काहीकाळ तणाव निर्माण झाला. अखेर विजय जाधव यांनी आपण ही यात्रा रद्द करीत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)