शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:27 IST

सांगली : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा ...

सांगली : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी करणाऱ्यांना लाठीप्रसाद दिला.

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून आठ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला. मात्र, बुधवारी सकाळी किराणा माल, भाजीपाला, बेकरी पदार्थ, धान्य खरेदीसाठी पुन्हा लोक रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांनी कठोर पावले उचलत गर्दी हटविली. गर्दी करणाऱ्यांना चोपही दिला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी गर्दी कमी होती. मात्र, लोकांचा वावर इतका होता की, सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला. अनेक दुकानांमध्ये लोक गर्दी करून होते.

सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये पुन्हा वाहनांची व खरेदीदारांची गर्दी झाली. त्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे एक पथक त्याठिकाणी आले. त्यांनी पूर्वेकडील प्रवेशद्वार बंद करून दुसऱ्या प्रवेशद्वाराने कारवाईस सुरुवात केली. गर्दीवर नियंत्रण न ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी दुकान बंद करण्याच्या सूचना दिल्या. गर्दी करणाऱ्या लोकांना लाठीने चोप दिला. त्यामुळे खरेदीदारांची पळापळ झाली. अर्ध्या तासात मार्केट यार्ड सामसूम झाले.

जुन्या भाजी मंडईतही साडे दहा वाजता पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी विक्रेत्यांना व खरेदीदारांना हुसकावून लावले. सकाळी ११ पूर्वीच येथील मंडई व फळमार्केट बंद झाले. त्यानंतर पोलिसांनी मारुती रोड, हरभट रोड, कापड पेठ, गणपती पेठ याठिकाणी मोर्चा वळविला. त्याठिकाणच्या दुकानदारांनाही बेशिस्तपणाबद्दल समज दिली. त्यामुळे बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सर्व पेठा शांत झाल्या.

चौकट

विक्रेते व पोलिसांत वाद

सांगलीच्या जुन्या भाजी मंडईतील कारवाईवेळी येथील संघटनेचे अध्यक्ष मुसाभाई सय्यद यांच्याकडे पोलीस काठी घेऊन धावले. व्यापार सुरू ठेवण्यावरून यावेळी वाद झाला.

चौकट

दिवसभर बाजारपेठा ओस

मंगळवारी रात्रीनंतर लॉकडाऊन सुरू झाला असला तरी बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासूनच शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा शांत झाल्या. पोलिसांच्या कठोर पवित्र्यामुळे लोकांच्या फिरण्यावर अंकुश बसला. पोलिसांची तपासणी व कारवाईची मोहीम दिवसभर सुरू होती.

चौकट

माधवनगरमध्येही लोक रस्त्यावर

माधवनगर येथेही बुधवारी सकाळी लाेक खरेदीसाठी रस्त्यावर आले. किराणा माल, बेकरी पदार्थ, धान्य, दूध आदी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याठिकाणी पोलीस फिरकले नसल्याने सकाळी आठ ते ११ वाजेपर्यंत नागरिक फिरत होते.