शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘धूम’ टोळीपुढे पोलीस हतबल

By admin | Updated: October 9, 2015 00:46 IST

गुन्ह्यांची मालिका : महिला टार्गेट; चोरट्यांनी बदलली वेळ; नाकाबंदी करुनही पोलिसांना चकवा

सचिन लाड -- सांगली -‘धूम’ टोळीने पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत तीन महिलांच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे दागिने हातोहात लंपास केले. टोळीतील गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. पाच-सहा फुटावर पोलीस असतानाही ते अगदी सहजपणे महिलांचे दागिने लंपास करीत आहेत. या टोळीने वेळ बदलून गुन्ह्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. पोलिसांना या गुन्हेगारांचे धागेदोरे सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्यासमोर पोलीस हतबल झाले असल्याचे चित्र आहे. पेन्शन मिळवून देतो, असे आमिष दाखवून वृद्ध महिलांना दुचाकीवर बसवून नेणे, पोलीस असल्याची बतावणी करुन पुढे खून झाला आहे, तपासणी सुरु आहे, दागिने काढून ठेवा, असे सांगून चोरट्यांनी लुबाडणुकीचे गुन्हे केले आहेत. याशिवाय दुचाकीवरून येऊनही अवघ्या तीन-चार सेकंदात महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहेत. केवळ विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सर्वाधिक गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत बदलत आहे. नवीन गुन्हेगारांचे रेकॉर्डच नसल्याने त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यासाठी कोणताच धागा सापडत नाही. बँक ग्राहकांना लुटण्याचे अनेक गुन्हे घडले आणि घडत आहेत; पण एकाही गुन्ह्याचा छडा लावता आलेला नाही. केवळ गुन्हे होऊ नयेत, यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसतात.गुन्हेगारांना पकडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी, त्यामध्ये ते सातत्य ठेवत नाहीत. गुन्हे घडले की, चार-आठ दिवस गतीने तपास केला जातो. मात्र पुन्हा ते मागे पडतात. पोलिसांच्या कामाची पद्धत या गुन्हेगारांनाही समजून आलेली नाही. त्यामुळे ते वेळ बदलून व परिस्थिती पाहून एक-दोन ठिकाणी हात मारुन पसार होत आहेत. गस्त पथके २४ तास फिरतात. तरीही गुन्हेगार सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पोलिसांच्या आतापर्यंतच्या गुन्ह्यात त्यांनी काळ्या रंगाच्या दुचाकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट केले होते. त्यामुळे पोलिसांनी भल्या पहाटे बंदोबस्त लावला होता; पण पोलिसांपेक्षा हे गुन्हेगार हुषार निघाले. त्यांनी दोन महिने विश्रांती घेऊन तीन दिवसांपूर्वी सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांना टार्गेट केल्याचे दिसून येते. यामुळे नेहमी पोलीसांना चोरट्यांनी चकवा देण्याचे काम केले आहे. आता संशयितांवर वाटमारीचे गुन्हेमहिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला जायचा; पण हे गुन्हे नेहमी घडू लागले. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, त्यांच्याकडून पुन्हा गुन्हे होऊ नयेत, यासाठी गुन्ह्याचे कलम बदलण्यात आले. चोरीऐवजी वाटमारीचे गुन्हे दाखल केले जाऊ लागले आहेत. वाटमारीच्या गुन्ह्यांमुळे किती महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास झाले, याची स्वतंत्र आकडेवारी पोलिसांकडे नाही. तरीही गेल्या नऊ महिन्यांत २० गुन्हे घडल्यास अंदाज आहे.नुसते आवाहन‘धूम’ टोळीतील गुन्हेगार कोण आहेत? ते कोठून येतात? या बाबी पोलिसांच्या तपासातून अद्याप पुढे आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांच्याबद्दल कोणतेही धागेदोरे सापडत नाहीत. गुन्हे होऊ नयेत, यासाठी पोलीस महिलांना परगाव व बाजारात जाताना महागडे दागिने घालून जाऊ नका, असे आवाहन करीत आहेत. पण अलीकडच्या काळात महिलांचे त्यांच्या घराजवळ जाऊन दागिने लंपास होत आहेत. महिलांनी काय करावे? हे आवाहन करण्याशिवाय पोलिसांना काहीच जमत नसल्याचे चित्र आहे.