शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

‘धूम’ टोळीपुढे पोलीस हतबल

By admin | Updated: October 9, 2015 00:46 IST

गुन्ह्यांची मालिका : महिला टार्गेट; चोरट्यांनी बदलली वेळ; नाकाबंदी करुनही पोलिसांना चकवा

सचिन लाड -- सांगली -‘धूम’ टोळीने पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत तीन महिलांच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे दागिने हातोहात लंपास केले. टोळीतील गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. पाच-सहा फुटावर पोलीस असतानाही ते अगदी सहजपणे महिलांचे दागिने लंपास करीत आहेत. या टोळीने वेळ बदलून गुन्ह्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. पोलिसांना या गुन्हेगारांचे धागेदोरे सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्यासमोर पोलीस हतबल झाले असल्याचे चित्र आहे. पेन्शन मिळवून देतो, असे आमिष दाखवून वृद्ध महिलांना दुचाकीवर बसवून नेणे, पोलीस असल्याची बतावणी करुन पुढे खून झाला आहे, तपासणी सुरु आहे, दागिने काढून ठेवा, असे सांगून चोरट्यांनी लुबाडणुकीचे गुन्हे केले आहेत. याशिवाय दुचाकीवरून येऊनही अवघ्या तीन-चार सेकंदात महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहेत. केवळ विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सर्वाधिक गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत बदलत आहे. नवीन गुन्हेगारांचे रेकॉर्डच नसल्याने त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यासाठी कोणताच धागा सापडत नाही. बँक ग्राहकांना लुटण्याचे अनेक गुन्हे घडले आणि घडत आहेत; पण एकाही गुन्ह्याचा छडा लावता आलेला नाही. केवळ गुन्हे होऊ नयेत, यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसतात.गुन्हेगारांना पकडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी, त्यामध्ये ते सातत्य ठेवत नाहीत. गुन्हे घडले की, चार-आठ दिवस गतीने तपास केला जातो. मात्र पुन्हा ते मागे पडतात. पोलिसांच्या कामाची पद्धत या गुन्हेगारांनाही समजून आलेली नाही. त्यामुळे ते वेळ बदलून व परिस्थिती पाहून एक-दोन ठिकाणी हात मारुन पसार होत आहेत. गस्त पथके २४ तास फिरतात. तरीही गुन्हेगार सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पोलिसांच्या आतापर्यंतच्या गुन्ह्यात त्यांनी काळ्या रंगाच्या दुचाकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट केले होते. त्यामुळे पोलिसांनी भल्या पहाटे बंदोबस्त लावला होता; पण पोलिसांपेक्षा हे गुन्हेगार हुषार निघाले. त्यांनी दोन महिने विश्रांती घेऊन तीन दिवसांपूर्वी सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांना टार्गेट केल्याचे दिसून येते. यामुळे नेहमी पोलीसांना चोरट्यांनी चकवा देण्याचे काम केले आहे. आता संशयितांवर वाटमारीचे गुन्हेमहिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला जायचा; पण हे गुन्हे नेहमी घडू लागले. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, त्यांच्याकडून पुन्हा गुन्हे होऊ नयेत, यासाठी गुन्ह्याचे कलम बदलण्यात आले. चोरीऐवजी वाटमारीचे गुन्हे दाखल केले जाऊ लागले आहेत. वाटमारीच्या गुन्ह्यांमुळे किती महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास झाले, याची स्वतंत्र आकडेवारी पोलिसांकडे नाही. तरीही गेल्या नऊ महिन्यांत २० गुन्हे घडल्यास अंदाज आहे.नुसते आवाहन‘धूम’ टोळीतील गुन्हेगार कोण आहेत? ते कोठून येतात? या बाबी पोलिसांच्या तपासातून अद्याप पुढे आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांच्याबद्दल कोणतेही धागेदोरे सापडत नाहीत. गुन्हे होऊ नयेत, यासाठी पोलीस महिलांना परगाव व बाजारात जाताना महागडे दागिने घालून जाऊ नका, असे आवाहन करीत आहेत. पण अलीकडच्या काळात महिलांचे त्यांच्या घराजवळ जाऊन दागिने लंपास होत आहेत. महिलांनी काय करावे? हे आवाहन करण्याशिवाय पोलिसांना काहीच जमत नसल्याचे चित्र आहे.