शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तासगावच्या मोर्चायुद्धाला पोलिसांचा ‘ब्रेक’

By admin | Updated: August 4, 2015 00:04 IST

कारवाईचा इशारा : मारामारीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपकडून आंदोलनासाठी निवेदन

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमश्चक्री झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी मोर्चा काढण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीने पोलीस उपअधीक्षकांना दिले. भाजपकडूनही असेच निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. दोन्हीकडून मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट होताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांनी दोन्ही पक्षांना कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे हे मोर्चे पेल्यातील वादळच ठरण्याची शक्यता आहे.शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. भाजपचे खासदार संजय पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील, युवराज पाटील, अमोल शिंंदे यांनी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांना सोमवारी दुपारी निवेदन दिले. या मोर्चाची बातमी सोशल मीडियावर फिरत असतानाच, भाजपकडूनही मोर्चा काढण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर फिरू लागली. भाजपचे जयवंत माळी आणि अन्य कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे निवेदन तहसील कार्यालयात दिले.मोर्चासंदर्भातील या निवेदनामुळे आणि सोशल मीडियावरील चर्चेमुळे दिवसभर प्रशासनाची आणि पोलिसांची धावपळ झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतानाच प्रसंगी कारवाईचा इशाराही त्यांनी दिल्यामुळे निर्माण झालेले वादळ सायंकाळी शांत झाले. (वार्ताहर)दोन्ही पक्षांची वेगवेगळी भूमिकादोन्ही पक्षांकडून एकाच दिवशी मोर्चा काढण्यात येणार असल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांनी कायदा व सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये यासाठी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे राष्ट्रवादीने मंगळवारचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपने लोकशाही मार्गाने मोर्चा काढणारच असल्याची भूमिका घेतली आहे.कायदा आणि सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मोर्चा काढल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, अविनाश पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशीही चर्चा केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोर्चा काढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. - कृष्णात पिंंगळे, पोलीस उपअधीक्षक.आम्ही मोर्चाचे निवेदन दिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मोर्चाचे निवेदन दिले. कायदा व सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये, यासाठी पोलीस उपअधीक्षकांच्या आवाहनानुसार मोर्चा रद्द केला आहे. मात्र शनिवारच्या घटनेत खरा अन्याय कोणी कोणावर केला आहे, तालुक्यात गुंडगिरी आणि दहशतीचे राजकारण कोण करत आहे, हे जनतेला माहिती आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी मंगळवारी खुशाल मोर्चा काढावा.- अविनाश पाटील, संचालक, तासगाव बाजार समिती, राष्ट्रवादी.