शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

तासगावच्या मोर्चायुद्धाला पोलिसांचा ‘ब्रेक’

By admin | Updated: August 4, 2015 00:04 IST

कारवाईचा इशारा : मारामारीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपकडून आंदोलनासाठी निवेदन

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमश्चक्री झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी मोर्चा काढण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीने पोलीस उपअधीक्षकांना दिले. भाजपकडूनही असेच निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. दोन्हीकडून मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट होताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांनी दोन्ही पक्षांना कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे हे मोर्चे पेल्यातील वादळच ठरण्याची शक्यता आहे.शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. भाजपचे खासदार संजय पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील, युवराज पाटील, अमोल शिंंदे यांनी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांना सोमवारी दुपारी निवेदन दिले. या मोर्चाची बातमी सोशल मीडियावर फिरत असतानाच, भाजपकडूनही मोर्चा काढण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर फिरू लागली. भाजपचे जयवंत माळी आणि अन्य कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे निवेदन तहसील कार्यालयात दिले.मोर्चासंदर्भातील या निवेदनामुळे आणि सोशल मीडियावरील चर्चेमुळे दिवसभर प्रशासनाची आणि पोलिसांची धावपळ झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतानाच प्रसंगी कारवाईचा इशाराही त्यांनी दिल्यामुळे निर्माण झालेले वादळ सायंकाळी शांत झाले. (वार्ताहर)दोन्ही पक्षांची वेगवेगळी भूमिकादोन्ही पक्षांकडून एकाच दिवशी मोर्चा काढण्यात येणार असल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांनी कायदा व सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये यासाठी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे राष्ट्रवादीने मंगळवारचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपने लोकशाही मार्गाने मोर्चा काढणारच असल्याची भूमिका घेतली आहे.कायदा आणि सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मोर्चा काढल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, अविनाश पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशीही चर्चा केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोर्चा काढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. - कृष्णात पिंंगळे, पोलीस उपअधीक्षक.आम्ही मोर्चाचे निवेदन दिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मोर्चाचे निवेदन दिले. कायदा व सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये, यासाठी पोलीस उपअधीक्षकांच्या आवाहनानुसार मोर्चा रद्द केला आहे. मात्र शनिवारच्या घटनेत खरा अन्याय कोणी कोणावर केला आहे, तालुक्यात गुंडगिरी आणि दहशतीचे राजकारण कोण करत आहे, हे जनतेला माहिती आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी मंगळवारी खुशाल मोर्चा काढावा.- अविनाश पाटील, संचालक, तासगाव बाजार समिती, राष्ट्रवादी.