शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

तानंग पाणी योजनेसाठी पर्याय द्या

By admin | Updated: July 20, 2015 00:04 IST

कानडवाडी ग्रामसभेत ठराव : एमआयडीसीकडे पाण्याची मागणी करण्याचा निर्णय

कुपवाड : तानंगसह इतर सात गावांची नळपाणी पुरवठा योजना पुढील महिन्याच्या प्रारंभापासून बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून देण्यात आल्यानंतर, औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेण्याविषयी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय रविवारी कानडवाडी ग्रामसभेत घेण्यात आला. त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जीवन प्राधिकरण विभागाने ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, असा ठरावही ग्रामस्थांनी केला आहे.तानंगसह इतर सात गावांची नळपाणी पुरवठा योजना ३ आॅगस्टपासून बंद करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी कानडवाडी (ता. मिरज) येथील ग्रामसभेत पर्यायी व्यवस्थेवर विचार करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सभेस कानडवाडीचे नेते अनिल शेगुणसे, भालचंद्र खोत गुरुजी, सरपंच रुक्साना मुजावर, उपसरपंच शीतल भोरे प्रमुख उपस्थित होते. अनिल शेगुणसे यावेळी म्हणाले की, कुपवाड एमआयडीसीमधील केमिकलमिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यामुळे कानडवाडीतील कूपनलिका आणि विहिरींचे पाणी खराब झाले. हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ हे तानंगसह इतर सात गावांच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून होते. ही योजनाच आता तोट्याचे कारण दाखवून पुढील महिन्याच्या प्रारंभापासून बंद करण्यात येणार आहे. त्याचा सर्वात मोठा फटका प्रामाणिकपणे पाणी बिले भरणाऱ्या कानडवाडीकरांना बसणार आहे. त्यामुळे आम्ही कदापीही पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था होईपर्यंत योजना बंद होऊ देणार नाही. त्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलनही उभे करू. खोत गुरुजींनीही जीवन प्राधिकरण विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडून आधीच अनियमित पाणीपुरवठा केला जात होता. त्यांनी स्वत:हूनच पाणी पुरवठा बंद करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आम्ही आता एमआयडीसीकडून पाणी घेऊ. त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत. पर्यायी व्यवस्थेबाबतचा ठरावही ग्रामसभेत केला असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसभेस कानडवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष शिवगोंडा कोथळे, उपाध्यक्ष अनुप खोत, सावळीचे श्रीकांत डोंगरे, कुबेर गणे, श्रीकांत भोरे, शुभांगी कर्वे, वर्षा वाळवेकर, बाळासाहेब खोत, मिलिंद खोत, प्रदीप खोत, संजय खोत, विद्याधर चौगुले, तानंगचे सरपंच पोपट राजमाने, काका भोरे, ब्रह्मनाथ खोत, सुनीता खोत, कुमार कर्वे, तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)उद्योगमंत्र्यांची भेट घेणार...तानंगसह सात गावांची पाणी योजना बंद झाल्यानंतर कानडवाडीतील ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. त्यातच येथील पाणीही एमआयडीसीमुळे खराब झाले आहे. त्यामुळे पिण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून अल्पशा दरात पाणी घेण्याशिवाय आम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. हे पाणी घेण्यासाठी आमचे नेते माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना लेखी निवेदन देणार आहोत. तसेच पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत सांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत.