शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी माफ करा

By admin | Updated: October 29, 2015 00:11 IST

जलसंधारण समितीत मागणीचा ठराव : टेंभू योजनेस १०० कोटी निधी द्या

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजना शंभर टक्के कार्यान्वित झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे ८३ गावांतील ७० हजार शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकित पाणीपट्टीचा बोजा चढवला जात आहे. तो त्वरित कमी करावा. त्या सर्व शेतकऱ्यांची पाणीपट्टी शासनाने माफ करून टंचाई निधीतून योजनेचे वीजबिल भरावे, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद जलसंधारण समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आला. टेंभूसाठी १०० कोटींचा निधी देण्याच्या मागणीचाही ठराव करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची बैठक अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना थेट पाणीपुरवठा केला जात नाही. अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होत नाही, तरीही त्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकित पाणीपट्टीचा बोजा चढविला जात आहे. मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील ८३ गावांतील ७० हजार शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर वीस कोटींचा बोजा चढविला आहे. तो त्वरित कमी करावा. या योजनेचे वीजबिल टंचाई निधीतून शासनाने भरून शेतकऱ्यांना पाणी द्यावे. टेंभू योजनेच्या पाण्याचा खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्याला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने त्वरित १०० कोटींचा निधी द्यावा, अशा मागणीचा ठराव अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी मांडला.या दोन्ही ठरावांस सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. दोन्ही ठराव शासनाकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले. क्षारपड जमिनीमध्ये क्षारपड निचराचर काढण्यासाठी रोजगार हमी योजनेतील कामे करण्यासाठी शासनाने परवानगी देण्याची मागणीही मुळीक यांनी केली.डफळापूर (ता. जत) येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम बसाप्पावाडी येथील तलावातील पाणी उचलण्यावरून वाद निर्माण झाल्याने अपूर्ण आहे. जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन तेथील वाद मिटवून योजना त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर दोन्ही गावांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन होर्तीकर यांनी दिले. (प्रतिनिधी)