शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी माफ करा

By admin | Updated: October 29, 2015 00:11 IST

जलसंधारण समितीत मागणीचा ठराव : टेंभू योजनेस १०० कोटी निधी द्या

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजना शंभर टक्के कार्यान्वित झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे ८३ गावांतील ७० हजार शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकित पाणीपट्टीचा बोजा चढवला जात आहे. तो त्वरित कमी करावा. त्या सर्व शेतकऱ्यांची पाणीपट्टी शासनाने माफ करून टंचाई निधीतून योजनेचे वीजबिल भरावे, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद जलसंधारण समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आला. टेंभूसाठी १०० कोटींचा निधी देण्याच्या मागणीचाही ठराव करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची बैठक अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना थेट पाणीपुरवठा केला जात नाही. अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होत नाही, तरीही त्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकित पाणीपट्टीचा बोजा चढविला जात आहे. मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील ८३ गावांतील ७० हजार शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर वीस कोटींचा बोजा चढविला आहे. तो त्वरित कमी करावा. या योजनेचे वीजबिल टंचाई निधीतून शासनाने भरून शेतकऱ्यांना पाणी द्यावे. टेंभू योजनेच्या पाण्याचा खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्याला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने त्वरित १०० कोटींचा निधी द्यावा, अशा मागणीचा ठराव अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी मांडला.या दोन्ही ठरावांस सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. दोन्ही ठराव शासनाकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले. क्षारपड जमिनीमध्ये क्षारपड निचराचर काढण्यासाठी रोजगार हमी योजनेतील कामे करण्यासाठी शासनाने परवानगी देण्याची मागणीही मुळीक यांनी केली.डफळापूर (ता. जत) येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम बसाप्पावाडी येथील तलावातील पाणी उचलण्यावरून वाद निर्माण झाल्याने अपूर्ण आहे. जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन तेथील वाद मिटवून योजना त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर दोन्ही गावांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन होर्तीकर यांनी दिले. (प्रतिनिधी)