शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी माफ करा

By admin | Updated: October 29, 2015 00:11 IST

जलसंधारण समितीत मागणीचा ठराव : टेंभू योजनेस १०० कोटी निधी द्या

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजना शंभर टक्के कार्यान्वित झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे ८३ गावांतील ७० हजार शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकित पाणीपट्टीचा बोजा चढवला जात आहे. तो त्वरित कमी करावा. त्या सर्व शेतकऱ्यांची पाणीपट्टी शासनाने माफ करून टंचाई निधीतून योजनेचे वीजबिल भरावे, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद जलसंधारण समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आला. टेंभूसाठी १०० कोटींचा निधी देण्याच्या मागणीचाही ठराव करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची बैठक अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना थेट पाणीपुरवठा केला जात नाही. अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होत नाही, तरीही त्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर थकित पाणीपट्टीचा बोजा चढविला जात आहे. मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील ८३ गावांतील ७० हजार शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर वीस कोटींचा बोजा चढविला आहे. तो त्वरित कमी करावा. या योजनेचे वीजबिल टंचाई निधीतून शासनाने भरून शेतकऱ्यांना पाणी द्यावे. टेंभू योजनेच्या पाण्याचा खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्याला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने त्वरित १०० कोटींचा निधी द्यावा, अशा मागणीचा ठराव अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी मांडला.या दोन्ही ठरावांस सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. दोन्ही ठराव शासनाकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले. क्षारपड जमिनीमध्ये क्षारपड निचराचर काढण्यासाठी रोजगार हमी योजनेतील कामे करण्यासाठी शासनाने परवानगी देण्याची मागणीही मुळीक यांनी केली.डफळापूर (ता. जत) येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम बसाप्पावाडी येथील तलावातील पाणी उचलण्यावरून वाद निर्माण झाल्याने अपूर्ण आहे. जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन तेथील वाद मिटवून योजना त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर दोन्ही गावांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन होर्तीकर यांनी दिले. (प्रतिनिधी)