शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

नावाला प्लास्टिक बंदी, प्रत्यक्ष वापराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:51 IST

शासनाने २ आॅक्टोबरपासून गांधी जयंतीदिनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. शासन निर्णयानंतर पहिले काही दिवस कारवाईचा बडगा उगारला गेला असला तरी, त्या कारवाईत सातत्यपणा तर नाहीच, शिवाय कारवाई करणाऱ्याने पाठ फिरवली की पुन्हा एकदा प्लास्टिकचा वापर सुरू होत आहे.

ठळक मुद्देनावाला प्लास्टिक बंदी, प्रत्यक्ष वापराची संधीकाही दिवस मोहीम, त्यानंतर प्रबोधन थंडावले

शरद जाधव सांगली : शासनाने २ आॅक्टोबरपासून गांधी जयंतीदिनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. शासन निर्णयानंतर पहिले काही दिवस कारवाईचा बडगा उगारला गेला असला तरी, त्या कारवाईत सातत्यपणा तर नाहीच, शिवाय कारवाई करणाऱ्याने पाठ फिरवली की पुन्हा एकदा प्लास्टिकचा वापर सुरू होत आहे.

शहरात महापालिका, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने प्लास्टिकविरोधी मोहीम राबविली असली तरी, अद्यापही बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तूंचा वापर सुरूच आहे. महापालिका क्षेत्रातच दररोज ४ टन प्लास्टिक कचरा तयार होत असल्याने बंदीचे वास्तव समोर येत आहे.प्लास्टिकच्या बेसुमार वापराने पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेऊन केंद्र शासनाने प्लास्टिकच्या वापरावर २ आॅक्टोबरपासून बंदी घातली. प्लास्टिक बंदीला दोन महिने पूर्ण होत आहेत. शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर करताना कारवाईपेक्षाही नागरिकांमध्ये जागरूकता करत स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक वापरणे टाळण्याच्या प्रबोधनावर भर दिला होता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरुवातीचे काही दिवस मोहीम राबविण्यात आली असली तरी, त्यानंतर प्रबोधन थंडावले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिकबंदीबाबत मोहीम राबविली होती; मात्र त्यावरही मर्यादा आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रशासन निवडणुका, महापुरासह अन्य कामातच अधिक व्यस्त असल्यानेही प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीस विलंब लागत आहे.

सुरुवातीला प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भाजीपाला, फळविके्रते, चिकन, मटण विक्रेते, किराणा दुकानदारांकडील प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, दुर्देवाने याठिकाणी समर्थ पर्याय देण्यात आला नसल्याने पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. सिंगल युज प्लास्टिकवर तर शासनाने पूर्ण बंदी घातली असतानाही याच पिशव्यांचा वापर जास्त आढळून येत आहे.बंदी जाहीर करताना दूध पिशव्यांसह पाणी बाटल्या परत केल्यास त्यास काही रक्कम देण्याची योजना आखली होती. मात्र, शासनाने दिलेली रिटर्न पॉलिसी खूपच किचकट असल्याने नागरिकांकडून अशा वस्तू टाकून दिल्या जात आहेत. बंदी असूनही प्लास्टिक वस्तूंचा वापर तर सुरू आहेच शिवाय त्याचे पर्यायही वापरले जात नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSangliसांगली