शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

प्लॅस्टिकवर बंदी म्हणजे असून अडचण, नसून..! पर्याय न देताच बंदी : निर्णयावर हवा सकारात्मक विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले,

शरद जाधव ।सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले, तर व्यापाऱ्यांनी त्यावर नापसंती व्यक्त केली. व्यापाºयांचा प्लॅस्टिक बंदीला विरोध नसला तरी, त्याला पर्याय द्या आणि मगच बंदी घाला, अशी मागणी केली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांची सर्वाधिक गरज असलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करत त्यांना पर्याय आणि प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी यावर निर्णयाचे यश अवलंबून आहे.

प्लॅस्टिकचा बेसुमार वापर व त्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ºहास यावर चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे यापूर्वी तीन वेळा प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीला अनेक कारणांनी खोडा बसत होता. काही घटकांनी निर्णयाचे स्वागतही केले, तर व्यापारी, विक्रेते, उत्पादकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय असणाºया कागदी अथवा कापडी पिशव्यांचा विषय समोर आला. त्याच्या उत्पादनात आता तरी मर्यादा असल्याने अनेक किरकोळ विक्रेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. किरकोळ विक्रेत्यांना लागणाºया प्रमुख साधनांत या पिशव्या असूनल त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे आव्हान शासनासमोर आहे.याठिकाणी होतो : पिशव्यांचा वापरकिराणा दुकान, भाजीपाला विक्रेते, मटण, चिकन यासह अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होतो. मटण, चिकन, मासे आदीमध्ये तर प्लॅस्टिक पिशव्यांमुळे माल व्यवस्थित राहत असल्याचा दावा विक्रेते करत आहेत. तरीही प्लॅस्टिक पिशव्यांचे दुष्परिणामही लक्षात घ्यावेतॉ, अशी अपेक्षा काहीजण व्यक्त करत आहेत.प्लॅस्टिक पिशवी काही सेकंदात तयार होते, तर ती नष्ट करण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागत असल्याने, आता समाजातील सर्वच घटकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा व इतर वस्तूंचा सोस सोडणे आवश्यक बनले आहे. प्लॅस्टिक पिशवी कितीही सोयीची असली तरी, शेवटी आपण स्वत:च पर्यावरणाच्या हानीला कारणीभूत ठरत आहोत, हेही विसरून चालणार नसल्याने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत, जेवढा होता होईल तेवढा प्लॅस्टिकचा वापर कमी करणे नागरिकांच्याच हाती आहे. किरकोळ विक्रेत्यांना मालाच्या पॅकिंगसाठीही नवा आणि सुलभ पर्याय दिला, तरच सर्व घटकांकडून या निर्णयाचे स्वागत होणार आहे.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSangliसांगली