शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरचा आराखडा परिपूर्ण हवा

By admin | Updated: March 25, 2016 23:39 IST

राजू शेट्टी : मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; घटक पक्षांच्या बैठकीत निर्णय

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ‘टार्गेट’ करून शहराचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील अन्यायी आरक्षणे रद्द करून नागरिकांच्या सुविधांसाठी परिपूर्ण विकास आराखडा मंजूर करावा, या मागणीसाठी सर्व घटकांना बरोबर घेऊन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.येथील शासकीय विश्रामगृहात खा. शेट्टी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी वगळता इतर घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, बाबा सूर्यवंशी, कपिल ओसवाल, एल. एन. शहा, विजय कुंभार, वैभव पवार, शकील सय्यद, अरुण कांबळे, सतीश महाडिक, जगन्नाथ चिप्रीकर, सनी खराडे, जयकर पाटील, भागवत जाधव उपस्थित होते. बैठकीत इस्लामपूरच्या नियोजित विकास आराखड्याबाबत चर्चा झाली. शेट्टी यांनी उपस्थित प्रतिनिधींचे मत आणि तक्रारी ऐकून घेतल्या. खा. शेट्टी म्हणाले, शहराची २०३० पर्यंतची वाढ गृहीत धरून सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा परिपूर्ण आराखडा असावा, अशी आमची भूमिका आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मनमानीपणे हा आराखडा तयार केला आहे. विरोधकांचा काटा काढायचा आणि आपल्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. पूर्वीच्या कॉँग्रेस आघाडी सरकारने या विकास आराखड्याबाबत निर्णय घेतला नाही. ते म्हणाले, राज्यात महायुती झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी इस्लामपूरचा विकास आराखडा रद्द करण्याबाबत आश्वासन दिले होते. याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली आहे. त्यामुळे आराखडा अंतिम व्हायच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटून अन्यायी आरक्षणे रद्द करण्यासह आरखड्यासाठी सुधारणाही सूचवणार आहोत.विक्रमभाऊ पाटील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आराखडा रद्द करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध चौका-चौकात जाहीर सभा घेतल्यावर २३०० नागरिकांनी आराखड्याविरोधात हरकती दाखल केल्या. नागरिकांचा हा रोष पाहून मग आ. जयंत पाटील यांनी अन्यायी आरक्षणे रद्द करू, असे आश्वासन दिले. तेथेच आम्ही यशस्वी झालो. राज्यात आता सत्तांतर झाले आहे, त्यामुळे हा अन्यायी आराखडा एक तर रद्द करणे किंवा चुकीची आरक्षणे वगळून शहरातील नागरिकांना दिलासा देण्याची जबाबदारी आमचीही आहे. ते म्हणाले, यापूर्वीच आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून आराखड्यात अन्याय झालेल्यांची यादी, मोठे रस्ते लहान केल्याची यादी, मोठे रस्ते रद्द केल्याची यादी दिली आहे. इतर अन्यायकारक बाबीही त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व तक्रारींची दखल घेतली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल. भाजपच्या सर्व वरिष्ठ मंत्र्यांच्या सहकार्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. (वार्ताहर)आठवलेंचा दौरा : रान तापविण्याचा प्रयत्नखा. राजू शेट्टी यांनी या बैठकीत येत्या १३ एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टीचे खासदार रामदास आठवले हे इस्लामपूर दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचा मोठा कार्यक्रम घेणार आहेत. शहरातील पालिकेमार्फत रखडलेल्या आंबेडकर पुतळा सुशोभिकरणाच्या विषयावरून सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान तापावण्याचीच तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.