शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू साकारणार राज्यातील पथदर्शी सिंचन प्रकल्प

By admin | Updated: June 10, 2017 00:30 IST

टेंभू साकारणार राज्यातील पथदर्शी सिंचन प्रकल्प

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : टेंभू योजनेचे पाणी आता बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. ही योजना सौरऊर्जाचलित सिंचन योजना होणार आहे. याशिवाय योजनेच्या लाभक्षेत्रात ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर अनिवार्य होणार आहे. लाभक्षेत्रात वितरिकानिहाय पाणी वापर संस्था निर्माण करून या संस्थांच्या माध्यमातून समन्यायी पाणी वाटप धोरण राबविण्यात येणार आहे. अशा पद्धतीने टेंभू योजना राज्यात पथदर्शी योजना होणार आहे. मात्र त्यासाठी भरीव निधीची गरज आहे. पाणी जपून वापरा, हा विचार पुढे धावतो आणि आचार मात्र मागे रेंगाळतो. त्यामुळेच टेंभू योजनेच्या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. सिंचन व्यवस्थापन विभागाकडे कर्मचारी संख्या अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणी वितरण व पाणीपट्टी वसुली ही कामे सक्षमपणे होत नाहीत. वीज बिल थकबाकीचे संकट सदैव योजनेसमोर असतेच. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सध्या १६५ मेगावॅट वीज लागते. या पार्श्वभूमीवर टेंभू प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक वीज निर्मिती सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. तशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात सांगली येथे केली आहे.या जलसाठ्यात पाणी भरण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा उपयोग पोहोच कालवे (फिडर कॅनॉल) म्हणून होणार आहे. गरज पडल्यास हे जलसाठे भरून देण्यासाठी बंद जलवाहिन्यांचा उपयोग केला जाणार आहे. या जलसाठ्यात घनमापन पद्धतीने पाणी मोजून दिले जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणीसाठा शेतकऱ्यांनी वापरला तरी, त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार नाही. लाभक्षेत्रात संपूर्ण ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा वापर अनिवार्य होणार आहे.1 टेंभू योजनेचे पाणी आता पोटकालव्याऐवजी बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. योजनेच्या मुख्य कालव्यामध्ये अस्तरीकरण होणार आहे आणि फक्त पोटकालव्याऐवजी जलवाहिनीमधून पाणी देण्याची व्यवस्था होणार आहे.2 टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचन पध्दत राबविण्यात येणार आहे. जागोजागी १०० हेक्टर लाभक्षेत्रासाठी चक (ब्लॉक) करून १५ दिवस पुरेल इतक्या क्षमतेचे विकेंद्रित जलसाठे निर्माण केले जाणार आहेत.3 लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचा उपयोग जलसाठे म्हणून प्राधान्याने होणार आहे.पाणी वापर संस्थेला घनमापन पध्दतीने पाणी मोजून दिले जाणार आहे आणि पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी पाणी वापर संस्थेवर राहणार आहे. त्यामुळे टेंभू योजना पाणीपट्टी वसुलीच्या अडचणीतून मुक्त होणार आहे. अशा पध्दतीने टेंभू योजना समन्यायी पाणी वाटप धोरण राबवून नवा आदर्श निर्माण करणार आहे.