शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

टेंभू साकारणार राज्यातील पथदर्शी सिंचन प्रकल्प

By admin | Updated: June 10, 2017 00:30 IST

टेंभू साकारणार राज्यातील पथदर्शी सिंचन प्रकल्प

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : टेंभू योजनेचे पाणी आता बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. ही योजना सौरऊर्जाचलित सिंचन योजना होणार आहे. याशिवाय योजनेच्या लाभक्षेत्रात ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर अनिवार्य होणार आहे. लाभक्षेत्रात वितरिकानिहाय पाणी वापर संस्था निर्माण करून या संस्थांच्या माध्यमातून समन्यायी पाणी वाटप धोरण राबविण्यात येणार आहे. अशा पद्धतीने टेंभू योजना राज्यात पथदर्शी योजना होणार आहे. मात्र त्यासाठी भरीव निधीची गरज आहे. पाणी जपून वापरा, हा विचार पुढे धावतो आणि आचार मात्र मागे रेंगाळतो. त्यामुळेच टेंभू योजनेच्या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. सिंचन व्यवस्थापन विभागाकडे कर्मचारी संख्या अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणी वितरण व पाणीपट्टी वसुली ही कामे सक्षमपणे होत नाहीत. वीज बिल थकबाकीचे संकट सदैव योजनेसमोर असतेच. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सध्या १६५ मेगावॅट वीज लागते. या पार्श्वभूमीवर टेंभू प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक वीज निर्मिती सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. तशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात सांगली येथे केली आहे.या जलसाठ्यात पाणी भरण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा उपयोग पोहोच कालवे (फिडर कॅनॉल) म्हणून होणार आहे. गरज पडल्यास हे जलसाठे भरून देण्यासाठी बंद जलवाहिन्यांचा उपयोग केला जाणार आहे. या जलसाठ्यात घनमापन पद्धतीने पाणी मोजून दिले जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणीसाठा शेतकऱ्यांनी वापरला तरी, त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार नाही. लाभक्षेत्रात संपूर्ण ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा वापर अनिवार्य होणार आहे.1 टेंभू योजनेचे पाणी आता पोटकालव्याऐवजी बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. योजनेच्या मुख्य कालव्यामध्ये अस्तरीकरण होणार आहे आणि फक्त पोटकालव्याऐवजी जलवाहिनीमधून पाणी देण्याची व्यवस्था होणार आहे.2 टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचन पध्दत राबविण्यात येणार आहे. जागोजागी १०० हेक्टर लाभक्षेत्रासाठी चक (ब्लॉक) करून १५ दिवस पुरेल इतक्या क्षमतेचे विकेंद्रित जलसाठे निर्माण केले जाणार आहेत.3 लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचा उपयोग जलसाठे म्हणून प्राधान्याने होणार आहे.पाणी वापर संस्थेला घनमापन पध्दतीने पाणी मोजून दिले जाणार आहे आणि पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी पाणी वापर संस्थेवर राहणार आहे. त्यामुळे टेंभू योजना पाणीपट्टी वसुलीच्या अडचणीतून मुक्त होणार आहे. अशा पध्दतीने टेंभू योजना समन्यायी पाणी वाटप धोरण राबवून नवा आदर्श निर्माण करणार आहे.