शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

टेंभू साकारणार राज्यातील पथदर्शी सिंचन प्रकल्प

By admin | Updated: June 10, 2017 00:30 IST

टेंभू साकारणार राज्यातील पथदर्शी सिंचन प्रकल्प

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : टेंभू योजनेचे पाणी आता बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. ही योजना सौरऊर्जाचलित सिंचन योजना होणार आहे. याशिवाय योजनेच्या लाभक्षेत्रात ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर अनिवार्य होणार आहे. लाभक्षेत्रात वितरिकानिहाय पाणी वापर संस्था निर्माण करून या संस्थांच्या माध्यमातून समन्यायी पाणी वाटप धोरण राबविण्यात येणार आहे. अशा पद्धतीने टेंभू योजना राज्यात पथदर्शी योजना होणार आहे. मात्र त्यासाठी भरीव निधीची गरज आहे. पाणी जपून वापरा, हा विचार पुढे धावतो आणि आचार मात्र मागे रेंगाळतो. त्यामुळेच टेंभू योजनेच्या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. सिंचन व्यवस्थापन विभागाकडे कर्मचारी संख्या अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणी वितरण व पाणीपट्टी वसुली ही कामे सक्षमपणे होत नाहीत. वीज बिल थकबाकीचे संकट सदैव योजनेसमोर असतेच. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सध्या १६५ मेगावॅट वीज लागते. या पार्श्वभूमीवर टेंभू प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक वीज निर्मिती सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. तशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात सांगली येथे केली आहे.या जलसाठ्यात पाणी भरण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा उपयोग पोहोच कालवे (फिडर कॅनॉल) म्हणून होणार आहे. गरज पडल्यास हे जलसाठे भरून देण्यासाठी बंद जलवाहिन्यांचा उपयोग केला जाणार आहे. या जलसाठ्यात घनमापन पद्धतीने पाणी मोजून दिले जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणीसाठा शेतकऱ्यांनी वापरला तरी, त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार नाही. लाभक्षेत्रात संपूर्ण ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा वापर अनिवार्य होणार आहे.1 टेंभू योजनेचे पाणी आता पोटकालव्याऐवजी बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. योजनेच्या मुख्य कालव्यामध्ये अस्तरीकरण होणार आहे आणि फक्त पोटकालव्याऐवजी जलवाहिनीमधून पाणी देण्याची व्यवस्था होणार आहे.2 टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचन पध्दत राबविण्यात येणार आहे. जागोजागी १०० हेक्टर लाभक्षेत्रासाठी चक (ब्लॉक) करून १५ दिवस पुरेल इतक्या क्षमतेचे विकेंद्रित जलसाठे निर्माण केले जाणार आहेत.3 लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचा उपयोग जलसाठे म्हणून प्राधान्याने होणार आहे.पाणी वापर संस्थेला घनमापन पध्दतीने पाणी मोजून दिले जाणार आहे आणि पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी पाणी वापर संस्थेवर राहणार आहे. त्यामुळे टेंभू योजना पाणीपट्टी वसुलीच्या अडचणीतून मुक्त होणार आहे. अशा पध्दतीने टेंभू योजना समन्यायी पाणी वाटप धोरण राबवून नवा आदर्श निर्माण करणार आहे.