शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

डाळिंब पीक विम्यास तलाठी दाखल्याने खोडा- आॅनलाईन अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:50 IST

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही

ठळक मुद्दे : न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना दाखले देण्यास निर्बंध-शासनानेच तोडगा काढण्याची गरज

गजानन पाटील ।संख : प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही दाखले देता येत नाहीत. त्यामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचणी आल्या आहेत. डाळिंब नोंदीचे उतारे मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदी करून उतारे आणावे लागत आहेत. आॅनलाईन नोंद वेळखाऊ आहे. तलाठी दाखल्याच्या अटीमुळे डाळिंब विमा भरण्यास खोडा बसला आहे. अनेक शेतकºयांना डाळिंब पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकºयांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने मदत होईल. ही बाब विचारात घेऊन फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबविली जात आहे. डाळिंब फळबागेसाठी १४ जुलै ही सहभागी होण्यास मुदत होती.

सांगली, सातारा, सोलापूर, अकोला, जालना, बुलडाणा, बीड, पुणे, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील डाळिंब फळबागांसाठी टाटा ए आय जी इन्शुरन्स कंपनीकडून विमा दिला जाणार आहे. तालुक्यामध्ये डाळिंब क्षेत्र १२ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. उजाड अशा माळरानावर बागा फुलवल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला आहे.

विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रांसह डाळिंब लागवडीच्या तलाठी दाखल्याची अट घातली आहे. दुसºया बाजूला तलाठ्यांना दाखले देण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे डाळिंब लागवडीचे दाखले मिळत नसल्यामुळे शेतकºयांचा विमा बॅँका भरून घेत नाहीत. उताºयावरील लागवडीवर शंका उपस्थित केल्या जातात. बॅँका तलाठ्याचाच दाखला मागत आहेत. कृषी सहायक किंवा कृषी अधिकाºयाचे दाखले स्वीकारले जात नाहीत. अलीकडे नवीन लागण केलेल्या डाळिंबाची उताºयावर नोंद नाही. त्यामुळे अशा शेतकºयांवर डाळिंब विमा भरण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.विम्यासाठी विमा फॉर्म, ७/१२ उतारा, खाते उतारा, लागवडीचा दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र झेरॉक्स, बॅँक पासबुक, तलाठ्याचा दाखला, स्वयंघोषित पत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.बँकांकडूनही असहकार्य : शेतकरी नाराजजळीत पीक विमा भरण्यासाठी बँकेकडूनही शेतकºयांना सहकार्य मिळत नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमध्ये शेतकरी हेलपाटे मारत आहेत. दरीबडची येथे अजूनही विमा भरण्यास सुरुवात झालेली नव्हती.

डाळिंब फळपीक दृष्टिक्षेप...लागवडीचे क्षेत्र- १२ हजार ३४४.५९ हेक्टरहेक्टरी विमा रक्कम - ६०५० रुपयेएकूण विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) - १ लाख २१ हजार

 

डाळिंब लागवडीच्या दाखल्याची अट शिथिल करून शेतकºयांना विमा भरण्यास मुभा द्यावी, तरच शेतकºयांना लाभ मिळेल. शासनाने यामध्ये लक्ष घालून दाखल्याची अट शिथिल न केल्यास जत, आटपाडी, कवठेमहांकाळ दुष्काळी भागातील शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.- विक्रम ढोणे