शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

डाळिंब पीक विम्यास तलाठी दाखल्याने खोडा- आॅनलाईन अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:50 IST

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही

ठळक मुद्दे : न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना दाखले देण्यास निर्बंध-शासनानेच तोडगा काढण्याची गरज

गजानन पाटील ।संख : प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही दाखले देता येत नाहीत. त्यामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचणी आल्या आहेत. डाळिंब नोंदीचे उतारे मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदी करून उतारे आणावे लागत आहेत. आॅनलाईन नोंद वेळखाऊ आहे. तलाठी दाखल्याच्या अटीमुळे डाळिंब विमा भरण्यास खोडा बसला आहे. अनेक शेतकºयांना डाळिंब पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकºयांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने मदत होईल. ही बाब विचारात घेऊन फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबविली जात आहे. डाळिंब फळबागेसाठी १४ जुलै ही सहभागी होण्यास मुदत होती.

सांगली, सातारा, सोलापूर, अकोला, जालना, बुलडाणा, बीड, पुणे, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील डाळिंब फळबागांसाठी टाटा ए आय जी इन्शुरन्स कंपनीकडून विमा दिला जाणार आहे. तालुक्यामध्ये डाळिंब क्षेत्र १२ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. उजाड अशा माळरानावर बागा फुलवल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला आहे.

विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रांसह डाळिंब लागवडीच्या तलाठी दाखल्याची अट घातली आहे. दुसºया बाजूला तलाठ्यांना दाखले देण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे डाळिंब लागवडीचे दाखले मिळत नसल्यामुळे शेतकºयांचा विमा बॅँका भरून घेत नाहीत. उताºयावरील लागवडीवर शंका उपस्थित केल्या जातात. बॅँका तलाठ्याचाच दाखला मागत आहेत. कृषी सहायक किंवा कृषी अधिकाºयाचे दाखले स्वीकारले जात नाहीत. अलीकडे नवीन लागण केलेल्या डाळिंबाची उताºयावर नोंद नाही. त्यामुळे अशा शेतकºयांवर डाळिंब विमा भरण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.विम्यासाठी विमा फॉर्म, ७/१२ उतारा, खाते उतारा, लागवडीचा दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र झेरॉक्स, बॅँक पासबुक, तलाठ्याचा दाखला, स्वयंघोषित पत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.बँकांकडूनही असहकार्य : शेतकरी नाराजजळीत पीक विमा भरण्यासाठी बँकेकडूनही शेतकºयांना सहकार्य मिळत नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमध्ये शेतकरी हेलपाटे मारत आहेत. दरीबडची येथे अजूनही विमा भरण्यास सुरुवात झालेली नव्हती.

डाळिंब फळपीक दृष्टिक्षेप...लागवडीचे क्षेत्र- १२ हजार ३४४.५९ हेक्टरहेक्टरी विमा रक्कम - ६०५० रुपयेएकूण विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) - १ लाख २१ हजार

 

डाळिंब लागवडीच्या दाखल्याची अट शिथिल करून शेतकºयांना विमा भरण्यास मुभा द्यावी, तरच शेतकºयांना लाभ मिळेल. शासनाने यामध्ये लक्ष घालून दाखल्याची अट शिथिल न केल्यास जत, आटपाडी, कवठेमहांकाळ दुष्काळी भागातील शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.- विक्रम ढोणे