शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

जनता कर्फ्यूतून वेठीस धरू नये : शेखर माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:10 IST

राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला जात आहे, असा सवाल माजी नगरसेवक शेखर माने यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सर्व पेठा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूतून वेठीस धरू नये : शेखर माने व्यापारी पेठा चालूच राहणार

सांगली : राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला जात आहे, असा सवाल माजी नगरसेवक शेखर माने यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सर्व पेठा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.माने यांनी कापड पेठ, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड येथील व्यापाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर पेठा सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. याबाबत माने यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्र व जिल्ह्यात आनावश्यक कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे.

त्यामुळे व्यापार व जनतेत भीतीचे वातावरण आहे. त्यांना आधार देण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेस व व्यापाऱ्यांना दहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आव्हान केले आहे, महापालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील जनता, व्यापाºयांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी न होण्याचे आवाहन आम्ही केले आहे.या संदर्भात सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ, हरभट रोड, सिंधी मार्केट, गणेश मार्केट व उपनगरांतील व्यवसायिकांशी या पार्श्वभूमी संवाद साधण्यात आला व्यापाऱ्यांच्यावतीने आम्ही कर्फ्यूस पूर्ण विरोध दर्शवित आहोत.

महापूर, कोरोना संकट व त्यामुळे लादले गेलेले लॉकडाऊन यामुळे कजार्चे हप्ते, कामगारांचा पगार, महापालिका व शासन टॅक्स विना व्यावसाय भरावा लागत आहे. त्यात पुन्हा दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी जनतेस व व्यापाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. ऊलट जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रथम जिल्हा प्रशासनाने व महापलिका प्रशासनाने गेल्या पाच महिन्यांपासून जनतेची आरोग्य व आर्थिक सुरक्षिततेची कोणती काळजी घेतली हे जाहीर करावे व मगच जनता कर्फ्यूचे आवाहन करावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली