शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जनता कर्फ्यूतून वेठीस धरू नये : शेखर माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:10 IST

राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला जात आहे, असा सवाल माजी नगरसेवक शेखर माने यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सर्व पेठा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूतून वेठीस धरू नये : शेखर माने व्यापारी पेठा चालूच राहणार

सांगली : राज्य व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकले जात असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र वारंवार कर्फ्यू पुकारला जात आहे. या माध्यमातून जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. योग्य उपाय सोडून जनता संचारबंदीचाच पर्याय सारखा का वापरला जात आहे, असा सवाल माजी नगरसेवक शेखर माने यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सर्व पेठा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.माने यांनी कापड पेठ, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड येथील व्यापाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर पेठा सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. याबाबत माने यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्र व जिल्ह्यात आनावश्यक कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे.

त्यामुळे व्यापार व जनतेत भीतीचे वातावरण आहे. त्यांना आधार देण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेस व व्यापाऱ्यांना दहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आव्हान केले आहे, महापालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील जनता, व्यापाºयांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी न होण्याचे आवाहन आम्ही केले आहे.या संदर्भात सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ, हरभट रोड, सिंधी मार्केट, गणेश मार्केट व उपनगरांतील व्यवसायिकांशी या पार्श्वभूमी संवाद साधण्यात आला व्यापाऱ्यांच्यावतीने आम्ही कर्फ्यूस पूर्ण विरोध दर्शवित आहोत.

महापूर, कोरोना संकट व त्यामुळे लादले गेलेले लॉकडाऊन यामुळे कजार्चे हप्ते, कामगारांचा पगार, महापालिका व शासन टॅक्स विना व्यावसाय भरावा लागत आहे. त्यात पुन्हा दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी जनतेस व व्यापाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. ऊलट जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रथम जिल्हा प्रशासनाने व महापलिका प्रशासनाने गेल्या पाच महिन्यांपासून जनतेची आरोग्य व आर्थिक सुरक्षिततेची कोणती काळजी घेतली हे जाहीर करावे व मगच जनता कर्फ्यूचे आवाहन करावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली