शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

लोकहो..! दुष्काळाचे भान ठेवत साजरी करुया रंगपंचमी...

By admin | Updated: March 28, 2016 00:04 IST

कोरडी रंगपंचमी साजरी करण्याकडे युवकांचा कल : पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी हवे प्रबोधन--रंगपंचमी विशेष

सांगली : रोजच्या दिनक्रमात थोडासा विरंगुळा आणि रंग भरणारा सण म्हणजे रंगपंचमी... उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना रंगपंचमी येत असल्याने रंगांची बेफाम उधळण आणि पाण्याचा वापर करत मोठ्या आनंदात रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे ‘पाण्याविना’ रंगपंचमी ही कल्पनाही करवत नाही. मात्र, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निर्माण झालेली दुष्काळाची दाहकता व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता दुष्काळाचे भान ठेवत पाण्याचा वापर टाळत रंगपंचमी साजरी करायला आता सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. रंगपंचमीला रंगांबरोबरच पाण्याचा बेसुमार वापर करत नेहमीच रंगपंचमी साजरी केली जाते. वर्षातून एकदा रंगांच्या उधळणीला आणि थोड्या फार रोमांचक क्षणाला कोणाची ना नसावी. मात्र, यंदाच्या वर्षात पाणीबाणी तीव्र झाल्याने रंगपंचमीला पाण्याचा वापर टाळणेच आवश्यक ठरणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळाच्या दाहकतेचा आढावा घेतला तर जिल्ह्यात आता सातशेहून अधिक वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. दोन दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कुठे एक घागर पाणी मिळते आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी मैलो न् मैल भटकंती जिल्ह्याच्या नशिबी आली आहे. या पार्श्वभूमीवर रंगपंचमीला पाण्याचा वापर टाळता येऊ शकतो. अगदी गेल्या आठवड्यात साजऱ्या झालेल्या होळीला मुंबईसह राज्यातील काही भागात कोरडी होळी साजरी करुन नवीन पायंडा निर्माण होतो आहे. मोठ्या शहरात काही ठिकाणी ‘एक टिळा होळी’ साजरी करुन पाण्याचा आणि आरोग्याला अपायकारक असणाऱ्या रंगांचाही मर्यादित वापर करण्यात आला आहे. आपल्याकडेही रंगपंचमी साजरी करताना अशा चांगल्या उपक्रमाचे अनुकरण करण्यास कोणाची हरकत नसावी. आपणही करूया ‘एक टिळा होळी’पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळी परिस्थितीमुळे रंगपंचमी खेळताना पाण्याचा वापर टाळला पाहिजे. पाण्याचा वापर टाळून रंग खेळला तरी पुन्हा तो धुऊन काढण्यासाठी पाण्याचा जादा वापर आलाच. त्यामुळे यंदाची पाणीबाणी लक्षात घेता राज्यात अन्य ठिकाणी राबविण्यात आलेले ‘एक टिळा होळी’ सारख्या उपक्रम राबविणे आवश्यक आहे.यंदा जिल्ह्यात टंचाई परिस्थिती गंभीर आहे. शहरातही पाण्याची टंचाई जाणवत आहे. यासाठी फक्त यावर्षी का होईना पाण्याचा वापर न करता रंगपंचमी साजरी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. कोरडी रंगपंचमी साजरी करुन, निसर्गपूरक रंगांचा वापर करूनही आनंद मिळू शकतो. त्यातून खऱ्याअर्थाने सामाजिक भान राखले जाईल. - डॉ. रवींद्र व्होरा, पर्यावरण तज्ज्ञसर्वांनीच गांभीर्याने विचार करत पाण्याचा वापर न करता कोरडी रंगपंचमी साजरी केली पाहिजे. टंचाई परिस्थितीचा सामना करणाऱ्या आपल्याच बांधवांचे होणारे हाल पाहून तर का होईना यंदाच्या रंगपंचमीत रंगांचा मर्यादित वापर केला पाहिजे. पाण्याचा अजिबात वापर न करता रंगपंचमी साजरी करत संपूर्णपणे नैसर्गिक रंग वापरुन आनंद व्दिगणित करुया. -प्रदीप सुतार, पर्यावरणप्रेमीसंपूर्ण राज्य दुष्काळाच्या गंभीर संकटाला सामोरे जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी धावपळ करावी लागत आहे. हीच परिस्थिती शहरातही आली असून, या टंचाई परिस्थितीचा अजून दोन महिने सामना करावा लागणार आहे. पाण्याचा वापर कमी करणे आणि रंगपंचमीमध्ये पाण्याचा वापरच टाळणे यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. शहरात नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून रंगपंचमीचा आनंद घ्यावा.- स्वरदा केळकर, नगरसेविका, सांगली,मिरज, कुपवाड, महापालिका