शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात विकासाचा पिंंगा अन् जनतेला ठेंगा

By admin | Updated: July 19, 2016 23:55 IST

साडेचार वर्षांचा कारभार : नेत्यांची आश्वासनांची वाऱ्यावरची वरात, बहुतांश नगरसेवकांची पुन्हा मोर्चेबांधणी

दत्ता पाटील-- तासगाव : तासगावात नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षणातून काही विद्यमान कारभाऱ्यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे. अपवाद वगळता बहुतांश विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी मोर्र्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र पालिकेचा साडेचार वर्षांचा कारभार, मिळून सारेजण अशाच पध्दतीने झाला. निवडणुकीच्या काळात नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची वाऱ्यावरची वरात निघाली. सर्वच गटाच्या आणि पक्षाच्या कारभाऱ्यांनी सत्ता भोगली, मात्र हा कारभार पाहिल्यानंतर शहरात ‘विकासाचा पिंंगा आणि जनतेला ठेंगा’ असेच चित्र असून, येणाऱ्या निवडणुकीत मतदारांकडून त्याचा जाब विचारला जाईल, हे नक्की.तासगाव नगरपालिकेची साडेचार वर्षांपूर्वी निवडणूक झाली. त्यावेळी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी या दोन्ही दिग्गज नेत्यांना आव्हान निर्माण केले होते. त्यावेळी आबा-काका गटाचे एकहाती वर्चस्व राहिले, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सुरुवातीची अडीच-तीन वर्षे दोन्ही नेत्यांच्या कारभाऱ्यांनी एकत्रित पालिकेचा गाडा चालवला. त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडीत काका गटाशी काडीमोड झाल्यानंतर काँग्रेसचा नगराध्यक्ष करुन काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता ताब्यात घेतली, तर सहा महिन्यांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपमय करून पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. कमी-जास्त प्रमाणात सर्वच पक्षाच्या आणि गटाच्या कारभाऱ्यांनी पालिकेची सत्ता भोगली. सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हितापेक्षा स्वहित जोपासण्यातच बहुतांश सत्ताधाऱ्यांनी समाधान मानले.निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न झाले नाहीत. नेत्यांकडून काही प्रमाणात आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा केला गेला. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला; मात्र या निधीवर ठेकेदारी आणि टक्केवारीच्या माध्यमातून डल्ला मारण्याचेच काम अनेकांनी केले. तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकत्रित आल्याने तासगावकरांनी मोठ्या विश्वासाने नेत्यांवर विश्वास ठेवून सत्ता ताब्यात दिली, मात्र पालिकेतील कारभाऱ्यांचा कारभार ठेकेदारी आणि टक्केवारीच्या पलीकडे गेला नाही. त्याहीपेक्षा सत्तेत राहून गटबाजी आणि सुंदोपसुंदीचा कलंकही कायम राहिला. शहरासाठी महत्त्वाकांक्षी ठरणारी कामे झाली, मात्र ही कामेही पूर्ण करता आली नाहीत. त्याउलट अपूर्ण कामांचे श्रेय घेण्यासाठीच अनेकांनी पुढाकार घेतला. साडेचार वर्षांच्या कारभारात जनतेचा विकासकामांच्या बाबतीत भ्रमनिरास झाला आहे. एकंदरीत आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागातील आरक्षण जैसे थे राहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नशीब अजमावण्यासाठी नगरसेवकांकडून तयारी सुरु झाली आहे. यानिमित्ताने मतदारांकडूनही कारभाराचा लेखाजोखा मांडला जात आहे. त्यातून आश्वासनांच्याबाबतीत केवळ भ्रमनिरासाचे चित्र दिसून येत आहे.नगरसेवक अन् ठेकेदारी चर्चेत नगरपालिकेच्या सत्तेचे चक्र सातत्याने फिरत राहिले. त्यातच नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे आणि नेत्यांच्या हतबलतेमुळे नगराध्यक्ष पदाचीही संगीत खुर्ची झाली. त्यातच शासनाकडून, विशेषत: यापूर्वी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि आता भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. मात्र हा निधी खर्च करताना जनतेची गरज पाहण्याऐवजी नगरसेवकांचे हित पाहिले गेले. नगरसेवकांची ठेकेदारी आणि टक्केवारीही सातत्याने चर्चेत राहिली. त्यामुळे कोट्यवधींचा चुराडा होऊनही शहरातील समस्या जैसे थे आहेत.आश्वासनांवर एक नजर शहरात मध्यवर्ती बसस्थानकालगत भले मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडले. मात्र ठेकेदारांकडून वेळेत काम झाले नाही. किंंबहुना या कामाच्या ठेकेदारांची आणि पडद्यामागील नगरसेवक ठेकेदारांचीही चर्चा होत राहिली. आजअखेर हे काम पूर्ण झाले नाही. मात्र नामांतरणाचा विषय मात्र चर्चेत आला.तासगाव शहरातील जनतेला मुबलक पाणी देण्यासाठी पाणी योजना मंजूर झाली. या योजनेसाठीदेखील कोट्यवधी रुपये मिळाले. याही योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. किंंबहुना योजनेचे निकृष्ट काम चव्हाट्यावर आले. काही दिवसांपूर्वी एका प्रभागात चोवीस तास पाण्याची सोय झाली. मात्र अन्य प्रभाग वंचितच राहिले.शहरांतर्गत रस्ते, गटारी, बोळ गरज नसताना दुसऱ्यांदा काम करुन निधी खर्च केला गेला. मात्र विस्तारित गुंठेवारी भागाच्या समस्यांचे गाऱ्हाणे कायम आहे.झोपडपट्टीमुक्त तासगाव शहरासाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विशेष योजनेतून झोपडपट्टीधारकांच्या घरकुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. या घरकुलांच्या कामांचा दर्जा तर अत्यंत निकृष्ट आहेच, किंंबहुना आजअखेर या घरकुलांचे कायदेशीरपणे झोपडपट्टीधारकांना वाटपही झालेले नाही.छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणीसाठी केवळ भूमिपूजन झाले आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उभारणी जागेच्या वादात रखडली आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढत आहे. रिंग रोडचा प्रश्नही जैसे थे आहे.