भिलवडी : शासनाने सामूहिक बँक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची रक्कम बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जयवंत कडू-पाटील यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्याचे पीक कर्ज थकीत नसेल, तर २०१९ च्या पुराची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी, असे आदेश संबंधित विभागाला दिले. २०१९ च्या महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या सामूहिक खाती असणाऱ्या म्हणजे ज्यांची खातेफोड नसल्याने सर्व्हे व गट नंबर एकच असलेल्या शेतकऱ्यांना या शासनाने कर्जमाफीचा लाभ दिला आहे. पण सदर रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न करता परस्पर पीक कर्जाला जमा करून घेण्याचे प्रकार उघडकीस आले होते. ही रक्कम शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी दिली आहे. ती तात्काळ वर्ग होत नाही तोपर्यंत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
बँकेच्या व्यवस्थापकांनी नुकसान भरपाई व कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश दिल्याने स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले आहे.
यावेळी प्रमोद गौंडाजे, प्रवीण माळी, रणजित पाटील, वैभव गौंडाजे आदींसह शेतकरी उपास्थित होते.
फोटो-10bhilwadi0110
फोटो ओळ:
स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जयवंत कडू-पाटील यांना निवेदन दिले.