शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

गावकुसाबाहेरील मुलांसाठी गावकऱ्यांचा पदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:17 PM

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सुया घे, पोत घे म्हणत भटकणाºया मरिआईवाले समाजातील पिढ्यान् पिढ्या शिक्षणापासून दूर परंपरेच्या अंध:कारात भटकत आहेत. अन्य समाजातील मुलांच्या शिक्षणाचा दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असला तरी त्यांच्या स्वप्नांना परिस्थितीने तडे जात असल्याचेही वास्तव पाहायला मिळते. बेळंकीतील ग्रामस्थांच्या हृदयाला या मुलांच्या स्वप्नांनी ‘इरादा’ या सामाजिक संस्थेच्या ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सुया घे, पोत घे म्हणत भटकणाºया मरिआईवाले समाजातील पिढ्यान् पिढ्या शिक्षणापासून दूर परंपरेच्या अंध:कारात भटकत आहेत. अन्य समाजातील मुलांच्या शिक्षणाचा दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असला तरी त्यांच्या स्वप्नांना परिस्थितीने तडे जात असल्याचेही वास्तव पाहायला मिळते. बेळंकीतील ग्रामस्थांच्या हृदयाला या मुलांच्या स्वप्नांनी ‘इरादा’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साद घातली आणि गावकुसाबाहेरील या मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी त्यांना पदरात घेतले.दररोज सुया, बिब्बे, पिना, कंगवे, टिकल्या विकून कुटुंबाची होणारी गुजराण...आजच्या आधुनिक जमान्यात सुया, बिब्बे या वस्तूंनाही कमी झालेली मागणी...ज्याचा संपूर्ण गावाला आदर त्या मरिआईचा गाडाही आता विसावलेलाच...त्यामुळे हाताचा आणि पोटाचा मेळ घालताना होणारी घुसमट गावकुसाबाहेरचा मरिआईवाले समाज भोगत असतो.बेळंकीमध्ये मरिआईवाले समाजातील काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. या समाजातील छाया भगवान मरिआईवाले या मुलीचे सातवीपर्यंतचे शिक्षण बेळंकीतील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले. आता पुढेच खरा संघर्ष छायाला अनुभवास येणार होता. तिला हायस्कूलला जाण्याची इच्छा होती. दररोज सुया, बिब्बे, टिकल्या विकून तिची आई कुटुंब चालवित आहे. शाळा नसताना छायासुध्दा आईबरोबर जात असे.हातावरचे पोट असणाºया उपेक्षित समाजातील छायाला शिक्षणासाठी वह्या, शैक्षणिक साहित्य, गणवेशाचीही भ्रांत होती. त्यामुळे तिला शिक्षण बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. ही बाब जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक मनोज बनकर यांनी इरादा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांना सांगितली. यावर ‘इरादा’चे स्वप्नील कोरे, सुभाष जाधव, डॉ. शरद गायकवाड, अनिरुध्द गवाणे, अक्षय कांबळे, वैभव रणदिवे या तरुणांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांनी त्या समाजातील मुलांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य वाटप केले.बेळंकीचे सरपंच राजाराम गायकवाड, माजी सरपंच पांडुरंग कोरे, श्रीराम उद्योग समूहाचे राजू गवाणे, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य नेताजी गडदरे, सुरेश कौलापुरे, केंद्रप्रमुख सुभाष पवार, मुख्याध्यापक पुष्पा मुळे, बेळंकी शाळेचे उपक्रमशील शिक्षक मनोज बनकर, नवनाथ नरळे आदींच्या उपस्थितीत छायाला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या समाजातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा निरंतर पोहोचविण्याचा इरादा बेळंकीकरांच्या दानशूरपणाचे उदाहरणच ठरले आहे.‘त्या’ मुलांना शिक्षित करणारपरिस्थिती आणि आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहणाºया मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा ‘इरादा’चा एक प्रयत्न सुरू आहे. त्याची सुरुवात छायाच्या शाळाप्रवेशापासून झाली. गावातील मरिआईवाले समाजातील १२ मुले शिक्षण घेत आहेत. इयत्ता ७ वी पर्यंतच्या प्राथमिक शिक्षणानंतर इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ‘इरादा’ने घेतली आहे.‘छाया’ ठरणार आदर्शबेळंकीतील मरिआईवाले या समाजाच्या संपूर्ण पिढीतील ‘छाया’ ही पहिली मुलगी इयत्ता सातवीपुढील शिक्षण घेत आहे. तिच्यानंतर विविध इयत्तेत आठ ते दहा मुले, मुली शिक्षण घेत आहेत. त्या सर्वांपुढे ‘छाया’ आदर्श ठरणार आहे.